शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

शिरुर अनंतपाळ तालुक्यात खरिपाची ८० टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यात खरीप हंगाम पेरणीचे दोन टप्पे पडले आहेत. सुरुवातीला मृगात दमदार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यात खरीप हंगाम पेरणीचे दोन टप्पे पडले आहेत. सुरुवातीला मृगात दमदार पाऊस झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. परंतु, मध्यंतरी पावसाने १५ दिवस दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी चाढ्यावरील मूठ थांबवली होती. गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. तालुक्यात आतापर्यंत २६ हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला असून, ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात २८ हजार ३८४ हेक्टर खरिपासाठी लागवडीचे क्षेत्र आहे. मृगातील पेरण्या निरोगी असतात म्हणून बहुतांश शेतकऱ्यांचा मृगाच्या मुहूर्तावर कल असतो. यंदा मृग सुरू होताच पावसाने दोनदा दमदार हजेरी लावली. ९४ मिमी पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांनी मिळेल त्या कंपनीचे खत आणि बियाणे खरेदी करुन पेरणीला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. परंतु, जूनच्या मध्यावधीत पावसाने १५ दिवस उघडीप दिली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. कोवळी पिके दुपार धरू लागली. शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या.

उजेड, साकोळ महसूल मंडलातील काही गावांमध्ये पेरणीला प्रारंभही झाला नाही. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मोठा पाऊस झाला नसला तरी चार दिवसांपासून रिमझिम पाऊस होत आहे. ब्रेक लागलेल्या पेरण्यांना पुन्हा सुरुवात झाली आहे. एकूण लागवड क्षेत्रापैकी २६ हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला आहे.

सोयाबीन २२ हजार हेक्टरवर...

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील जमीन सोयाबीन उत्पादकतेसाठी अत्यंत उपयुक्त असल्यामुळे यंदा २८ हजार ३८४पैकी २३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत २६ हजार हेक्टरपैकी २२ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. यंदा तालुक्यात ३ हजार ७५० हेक्टरवर तुरीचा पेरा करण्याचे नियोजन होते. त्यापैकी आजपर्यंत २ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला आहे. हायब्रीड, उडीद, मुगाची पेरणी करण्यात आली आहे.

सरासरी २२६.२ मिमी पाऊस...

तालुक्यात आतापर्यंत सरासरी २२६.२ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. खरिपाच्या २८ हजार ३८४ हेक्टरपैकी २६ हजार हेक्टरवर आजपर्यंत पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, अद्याप २० टक्के पेरण्या सुरू असल्याचे कृषी अधिकारी संजय नाबदे, शिवप्रसाद वलांडे यांनी सांगितले.