शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

७ किमी रस्त्याचे काम दोन वर्षांपासून अर्धवट स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:19 IST

निलंगा शहरातून असलेल्या लातूर- बिदर रस्त्यावरील खरोशाकडे जाणाऱ्या मार्गावरील ७ किमी अंतरापर्यंतच्या डागडुजीसाठी दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २ ...

निलंगा शहरातून असलेल्या लातूर- बिदर रस्त्यावरील खरोशाकडे जाणाऱ्या मार्गावरील ७ किमी अंतरापर्यंतच्या डागडुजीसाठी दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २ कोटी ५० लाख काम मंजूर झाले होते. मात्र, संबंधित गुत्तेदाराने दोन वर्षांत केवळ थातूरमातूर काम केले. तेही अर्धवट स्थितीत आहे. याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्यासंदर्भात वृत्तपत्रांतून वारंवार वृत्त प्रकाशित होताच थोडे- थोडे काही ठिकाणी काम करण्यात आले.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अद्याप मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे काम कधी पूर्ण होणार, असा सवाल नागरिकांतून होत आहे. दरम्यान, या कामास विलंब होत असल्याने विविध पक्ष, संघटनांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने हे काम अद्याप अर्धवट आहे. सदरील गुत्तेदारास नोटीस काढून हे काम पूर्ण करुन घ्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हा मार्ग आंध्रप्रदेश, कर्नाटक व तेलंगणा या तीन राज्यांना जोडणारा आहे. या मार्गावर सतत मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते. खड्डयांमुळे यापूर्वी या मार्गावर उसाचे ट्रक उलटले होते. तसेच छोटे-मोठे अपघात हे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

पालिकेकडून खोदकाम...

याबाबत सार्वजिनक बांधकाम विभागाचे अभियंता जांभळे म्हणाले, सदरील रस्ता हा नगरपरिषदेने खोदला आहे. त्यामुळे खड्डे पडले आहेत. याबाबत नगरपालिका प्रशासनास कळवले आहे. मात्र, त्यांनी अद्याप हे काम पूर्ण केले नसल्याचे सांगितले.