शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६९५.५३३ दलघमी पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा यंदा ३४८.८३४ दलघमी पाणीसाठा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST

लातूर जिल्ह्यात एकूण १४२ प्रकल्प आहेत. त्यात दोन मोठ्या प्रकल्पांचा समावेश असून ८ मध्यम प्रकल्प आणि १३२ लघु प्रकल्प ...

लातूर जिल्ह्यात एकूण १४२ प्रकल्प आहेत. त्यात दोन मोठ्या प्रकल्पांचा समावेश असून ८ मध्यम प्रकल्प आणि १३२ लघु प्रकल्प आहेत. मांजर आणि तेरणा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. त्यातील मांजरा ९० टक्के भरला आहे. या प्रकल्पावर शहराचा पाणीपुरवठा आणि सिंचन क्षेत्र मोठे आहे. हा प्रकल्प भरल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. आठ मध्यम प्रकल्पांपैकी रेणा, तिरू, देवर्जन, साकोळ हे चार मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. घरणी आणि व्हट्टी हे दोन्ही प्रकल्प भरत आले आहेत. मसलगा प्रकल्पात ६० टक्क्यांच्यावर पाणी आले आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये ७७.४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर लघु प्रकल्पांमध्ये, ६७.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सध्या जिल्ह्यात ६९५.५३३ दलघमी पाणीसाठा असून त्यातील उपयुक्त पाणी ५११.७११ दलघमी आहे. जवळपास ७३.५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा जिल्ह्यात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून सिंचनाचाही जवळपास प्रश्न सुटलेला आहे.

अशी आहे उपलब्ध पाण्याची टक्केवारी.....

मध्यम प्रकल्पांमध्ये ७७.४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, लघु प्रकल्पांमध्ये ६७.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

१४२ प्रकल्पांपैकी २५ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. तर १९ प्रकल्पांमध्ये ५० ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. १५ प्रकल्पामध्ये २५ ते ५० टक्के पाणीसाठा असून, २० प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा झाला आहे. तर ८ प्रकल्प अत्यल्प पाणी साठ्यात आहेत.

तालुकानिहाय आतापर्यंत झालेला पाऊस...

जिल्ह्यात आतापर्यंत ७२४८ मि. मी. पाऊस झाला असून गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत फक्त ५४६ मी.मी. पाऊस झाला होता. यंदा दोनशे मि. मी. पाऊस अधिक झाला आहे. लातूर ७१४.१, औसा ६७७.८, अहमदपूर ८२६, निलंगा ६१४.४, उदगीर ७९८.८, चाकूर ७३२.५, रेणापूर ८०६.९, देवणी ६५३.५, शिरूर अनंतपाळ ७७५.२, जळकोट तालुक्यात ८५३.२ मि. मी. पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे पाणीसाठा झाला आहे. खरिपाची पेरणी यामुळे यंदा वेळेत होणार आहे. सोयाबीनला सध्या मिळत असलेला भाव असाच पुढील एक ते दोन महिने राहिल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल. त्यासाठी सोयाबीनचा दर असाच स्थिर राहणे आवश्यक आहे.