शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

जिल्ह्यात ६९५.५३३ दलघमी पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा यंदा ३४८.८३४ दलघमी पाणीसाठा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST

लातूर जिल्ह्यात एकूण १४२ प्रकल्प आहेत. त्यात दोन मोठ्या प्रकल्पांचा समावेश असून ८ मध्यम प्रकल्प आणि १३२ लघु प्रकल्प ...

लातूर जिल्ह्यात एकूण १४२ प्रकल्प आहेत. त्यात दोन मोठ्या प्रकल्पांचा समावेश असून ८ मध्यम प्रकल्प आणि १३२ लघु प्रकल्प आहेत. मांजर आणि तेरणा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. त्यातील मांजरा ९० टक्के भरला आहे. या प्रकल्पावर शहराचा पाणीपुरवठा आणि सिंचन क्षेत्र मोठे आहे. हा प्रकल्प भरल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. आठ मध्यम प्रकल्पांपैकी रेणा, तिरू, देवर्जन, साकोळ हे चार मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. घरणी आणि व्हट्टी हे दोन्ही प्रकल्प भरत आले आहेत. मसलगा प्रकल्पात ६० टक्क्यांच्यावर पाणी आले आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये ७७.४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर लघु प्रकल्पांमध्ये, ६७.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सध्या जिल्ह्यात ६९५.५३३ दलघमी पाणीसाठा असून त्यातील उपयुक्त पाणी ५११.७११ दलघमी आहे. जवळपास ७३.५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा जिल्ह्यात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून सिंचनाचाही जवळपास प्रश्न सुटलेला आहे.

अशी आहे उपलब्ध पाण्याची टक्केवारी.....

मध्यम प्रकल्पांमध्ये ७७.४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, लघु प्रकल्पांमध्ये ६७.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

१४२ प्रकल्पांपैकी २५ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. तर १९ प्रकल्पांमध्ये ५० ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. १५ प्रकल्पामध्ये २५ ते ५० टक्के पाणीसाठा असून, २० प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा झाला आहे. तर ८ प्रकल्प अत्यल्प पाणी साठ्यात आहेत.

तालुकानिहाय आतापर्यंत झालेला पाऊस...

जिल्ह्यात आतापर्यंत ७२४८ मि. मी. पाऊस झाला असून गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत फक्त ५४६ मी.मी. पाऊस झाला होता. यंदा दोनशे मि. मी. पाऊस अधिक झाला आहे. लातूर ७१४.१, औसा ६७७.८, अहमदपूर ८२६, निलंगा ६१४.४, उदगीर ७९८.८, चाकूर ७३२.५, रेणापूर ८०६.९, देवणी ६५३.५, शिरूर अनंतपाळ ७७५.२, जळकोट तालुक्यात ८५३.२ मि. मी. पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे पाणीसाठा झाला आहे. खरिपाची पेरणी यामुळे यंदा वेळेत होणार आहे. सोयाबीनला सध्या मिळत असलेला भाव असाच पुढील एक ते दोन महिने राहिल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल. त्यासाठी सोयाबीनचा दर असाच स्थिर राहणे आवश्यक आहे.