शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६९५.५३३ दलघमी पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा यंदा ३४८.८३४ दलघमी पाणीसाठा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST

लातूर जिल्ह्यात एकूण १४२ प्रकल्प आहेत. त्यात दोन मोठ्या प्रकल्पांचा समावेश असून ८ मध्यम प्रकल्प आणि १३२ लघु प्रकल्प ...

लातूर जिल्ह्यात एकूण १४२ प्रकल्प आहेत. त्यात दोन मोठ्या प्रकल्पांचा समावेश असून ८ मध्यम प्रकल्प आणि १३२ लघु प्रकल्प आहेत. मांजर आणि तेरणा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. त्यातील मांजरा ९० टक्के भरला आहे. या प्रकल्पावर शहराचा पाणीपुरवठा आणि सिंचन क्षेत्र मोठे आहे. हा प्रकल्प भरल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. आठ मध्यम प्रकल्पांपैकी रेणा, तिरू, देवर्जन, साकोळ हे चार मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. घरणी आणि व्हट्टी हे दोन्ही प्रकल्प भरत आले आहेत. मसलगा प्रकल्पात ६० टक्क्यांच्यावर पाणी आले आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये ७७.४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर लघु प्रकल्पांमध्ये, ६७.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सध्या जिल्ह्यात ६९५.५३३ दलघमी पाणीसाठा असून त्यातील उपयुक्त पाणी ५११.७११ दलघमी आहे. जवळपास ७३.५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा जिल्ह्यात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून सिंचनाचाही जवळपास प्रश्न सुटलेला आहे.

अशी आहे उपलब्ध पाण्याची टक्केवारी.....

मध्यम प्रकल्पांमध्ये ७७.४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, लघु प्रकल्पांमध्ये ६७.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

१४२ प्रकल्पांपैकी २५ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. तर १९ प्रकल्पांमध्ये ५० ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. १५ प्रकल्पामध्ये २५ ते ५० टक्के पाणीसाठा असून, २० प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा झाला आहे. तर ८ प्रकल्प अत्यल्प पाणी साठ्यात आहेत.

तालुकानिहाय आतापर्यंत झालेला पाऊस...

जिल्ह्यात आतापर्यंत ७२४८ मि. मी. पाऊस झाला असून गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत फक्त ५४६ मी.मी. पाऊस झाला होता. यंदा दोनशे मि. मी. पाऊस अधिक झाला आहे. लातूर ७१४.१, औसा ६७७.८, अहमदपूर ८२६, निलंगा ६१४.४, उदगीर ७९८.८, चाकूर ७३२.५, रेणापूर ८०६.९, देवणी ६५३.५, शिरूर अनंतपाळ ७७५.२, जळकोट तालुक्यात ८५३.२ मि. मी. पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे पाणीसाठा झाला आहे. खरिपाची पेरणी यामुळे यंदा वेळेत होणार आहे. सोयाबीनला सध्या मिळत असलेला भाव असाच पुढील एक ते दोन महिने राहिल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल. त्यासाठी सोयाबीनचा दर असाच स्थिर राहणे आवश्यक आहे.