शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बँक कर्मचा-यांचा संप; कोट्यवधींचे व्यवहार ठप्प, लातूर जिल्ह्यातील ६५० कर्मचारी संपात सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 19:55 IST

सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी ८ व ९ जानेवारी रोजी राष्ट्रव्यापी संप पुकारला आहे.

लातूर - सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी ८ व ९ जानेवारी रोजी राष्ट्रव्यापी संप पुकारला आहे. या संपात लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांत कार्यरत असलेल्या ६५० कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला. परिणामी, मंगळवारी जवळपास १५० कोटींचा व्यवहार ठप्प झाला. आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने देशभरात कामगारांनी संप पुकारला आहे. या आंदोलनात बँक कर्मचारीही सहभागी आहेत. लातूर शहरातील बँक आॅफ महाराष्ट्रच्या मुख्य शाखेसमोर बँक कर्मचाºयांनी मंगळवारी निदर्शने केली. यावेळी कॉ. धनंजय कुलकर्णी म्हणाले, सरकारचे आर्थिक त्याचबरोबर कामगार विषयक धोरण चुकीचे आहे. सध्या बँकिंग उद्योगांचे खाजगीकरण करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. बँक एकत्रिकरणाच्या माध्यमातून सरकार आपले एकत्रिकरणाचे धोरण राबवीत आहे. याशिवाय, सरकारचा आर्थिक निर्णय निश्चलीकरण, जीएसटी, एफआरडीआय विधेयकामुळे बँकिंग उद्योगात अस्थिरतेचे वातावरण आहे.बँकिंगमधल्या रिक्त जागांवर कर्मचा-यांची भरती केली जात नाही. सरकार नोकर भरती करण्याऐवजी प्रत्येक काम कंत्राटी पद्धतीने करवून घेत आहे. त्यामुळे हजारो जागा रिक्त आहेत. त्या भरण्यात याव्यात, यासह अन्य विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगार, बँक कर्मचाºयांनी दोन दिवसीय राष्ट्रव्यापी संप पुकारला आहे. यावेळी कॉ. प्रशांत धामणगावकर, उत्तम होळीकर, महेश गंधले, सचिन एकुरगे, प्रकाश जोशी, आदित्य देशपांडे, परमेश्वर बडगिरे, प्रणाली मेश्राम, राधिका मुंदडा, महेश घोडके, गजानन औटी, रोहित पेंडसे, श्रीकृष्ण मांडे आदींसह विविध संघटनेचे कर्मचारी, कामगार उपस्थित होते. व्यवहारावर परिणाम... देशातील दहा केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसीय देशव्यापी संपामुळे बँकिंग व्यवहारावर परिणाम झाला आहे. या दोन दिवसांत सरासरी ३०० कोटींची उलाढाल ठप्प होईल, अशी माहिती कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी दिली. 

 

टॅग्स :bankबँक