शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

सिंचन विहिरींचे ६४ प्रस्ताव धूळ खात, शेतकऱ्यांकडून सातत्याने चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:26 IST

जळकोट : मग्रारोहयोअंतर्गत तालुक्यातील ४७ गावांतून ११५ प्रस्ताव सिंचन विहिरींचे दाखल झाले हाेते. त्यातील ५० विहिरींना मंजुरी मिळाली आहे. ...

जळकोट : मग्रारोहयोअंतर्गत तालुक्यातील ४७ गावांतून ११५ प्रस्ताव सिंचन विहिरींचे दाखल झाले हाेते. त्यातील ५० विहिरींना मंजुरी मिळाली आहे. मात्र, उर्वरित ६४ शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांकडून सातत्याने चौकशी केली जात आहे. दरम्यान, मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे काही मजूर कामाच्या शोधात फिरत असल्याचे दिसून येत आहे.

जळकोट हा डोंगरी, मजुरांचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात खरिपाचे एकच हंगामी पीक घेतले जाते. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, असे शेतकरी रब्बी हंगाम घेतात. तालुक्यात मजुरांची एकूण संख्या २५ हजारपेक्षा जास्त आहे. त्यामुळे येथील मजुरांच्या हाताला नेहमी काम मिळणे अपेक्षित असते. सिंचनाचे क्षेत्र वाढावे आणि त्याचा शेतकऱ्यांना लाभ होऊन आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून शासनाच्या वतीने मग्रारोहयोअंतर्गत सिंचन विहीर खोदकाम केले जाते. त्यामुळे शेतीसाठी सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांना लाभ होतो. याशिवाय, मजुरांच्या हाताला काम मिळते. या विहिरीसाठी शासनाकडून तीन लाखांचे अनुदान देण्यात येते.

यंदा जळकोट तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावलेल्या आहेत. दरम्यान, तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांनी मग्रारोहयोअंतर्गत सिंचन विहिरीसाठी प्रस्ताव दाखल केले होते; परंतु त्यातील केवळ ५० प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. उर्वरित प्रस्ताव अद्यापही जिल्हा परिषदेकडे धूळ खात पडून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

मंजुरी मिळाल्यानंतर कार्यारंभ आदेश...

सदरील शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले आहेत. मंजुरी मिळताच संबंधित पात्र लाभार्थ्यांना तत्काळ विहीर खोदकामाचे कार्यारंभ आदेश देण्यात येतील. लवकरच प्रस्तावास मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

- चंद्रहार ढोकणे, गटविकास अधिकारी.

मजुरांचे स्थलांतर थांबवा...

प्रशासनाने तत्काळ सिंचन विहिरींना मंजुरी द्यावी. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम उपलब्ध होईल. त्यातून मजुरांचे स्थलांतर थांबेल, अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले, जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, माजी नगरसेवक शिवानंद देशमुख, खादरभाई लाटवाले, सत्यवान पाटील दळवे, संग्राम पाटील हसुळे, विठ्ठल चव्हाण, अरुण पाटील आगलावे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, रामेश्वर पाटील, आदींनी केली आहे.