शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

सिंचन विहिरींचे ६४ प्रस्ताव धूळ खात, शेतकऱ्यांकडून सातत्याने चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:26 IST

जळकोट : मग्रारोहयोअंतर्गत तालुक्यातील ४७ गावांतून ११५ प्रस्ताव सिंचन विहिरींचे दाखल झाले हाेते. त्यातील ५० विहिरींना मंजुरी मिळाली आहे. ...

जळकोट : मग्रारोहयोअंतर्गत तालुक्यातील ४७ गावांतून ११५ प्रस्ताव सिंचन विहिरींचे दाखल झाले हाेते. त्यातील ५० विहिरींना मंजुरी मिळाली आहे. मात्र, उर्वरित ६४ शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांकडून सातत्याने चौकशी केली जात आहे. दरम्यान, मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे काही मजूर कामाच्या शोधात फिरत असल्याचे दिसून येत आहे.

जळकोट हा डोंगरी, मजुरांचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात खरिपाचे एकच हंगामी पीक घेतले जाते. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, असे शेतकरी रब्बी हंगाम घेतात. तालुक्यात मजुरांची एकूण संख्या २५ हजारपेक्षा जास्त आहे. त्यामुळे येथील मजुरांच्या हाताला नेहमी काम मिळणे अपेक्षित असते. सिंचनाचे क्षेत्र वाढावे आणि त्याचा शेतकऱ्यांना लाभ होऊन आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून शासनाच्या वतीने मग्रारोहयोअंतर्गत सिंचन विहीर खोदकाम केले जाते. त्यामुळे शेतीसाठी सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांना लाभ होतो. याशिवाय, मजुरांच्या हाताला काम मिळते. या विहिरीसाठी शासनाकडून तीन लाखांचे अनुदान देण्यात येते.

यंदा जळकोट तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावलेल्या आहेत. दरम्यान, तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांनी मग्रारोहयोअंतर्गत सिंचन विहिरीसाठी प्रस्ताव दाखल केले होते; परंतु त्यातील केवळ ५० प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. उर्वरित प्रस्ताव अद्यापही जिल्हा परिषदेकडे धूळ खात पडून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

मंजुरी मिळाल्यानंतर कार्यारंभ आदेश...

सदरील शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले आहेत. मंजुरी मिळताच संबंधित पात्र लाभार्थ्यांना तत्काळ विहीर खोदकामाचे कार्यारंभ आदेश देण्यात येतील. लवकरच प्रस्तावास मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

- चंद्रहार ढोकणे, गटविकास अधिकारी.

मजुरांचे स्थलांतर थांबवा...

प्रशासनाने तत्काळ सिंचन विहिरींना मंजुरी द्यावी. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम उपलब्ध होईल. त्यातून मजुरांचे स्थलांतर थांबेल, अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले, जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, माजी नगरसेवक शिवानंद देशमुख, खादरभाई लाटवाले, सत्यवान पाटील दळवे, संग्राम पाटील हसुळे, विठ्ठल चव्हाण, अरुण पाटील आगलावे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, रामेश्वर पाटील, आदींनी केली आहे.