शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाच्या धास्तीने ५३ टक्के बस फेऱ्या रद्द; दिवसभरात २० लाखांचा व्यवसाय बुडाला

By आशपाक पठाण | Updated: February 17, 2024 18:20 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत.

लातूर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. अनेक ठिकाणी रास्ता रोको, उपोषणे सुरू आहेत. याचा परिणाम राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर झाला आहे. शनिवारी खबरदारी म्हणून लातूर विभागातून लांब पल्ल्याच्या बसेस थांबविण्यात आल्या आहेत. ५३ टक्के बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या असून यात जवळपास २० लाखांचा व्यवसाय बुडाला आहे.

लातूर आगारातून शनिवारी पहाटे ४ वाजेपासूनच जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या, तसेच लांब पल्ल्याच्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. दुपारी ४ वाजेपर्यंत जिल्हाबाहेर जाणारी एकही बस सोडण्यात आली नाही. महामंडळाच्या लातूर विभागातून दिवसभरात १ हजार ६४९ बसफेऱ्या होतात. शनिवारी ६०३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्हांतर्गत निलंगा, औसा, अहमदपूर, उदगीर, जळकोट, रेणापूर, चाकूर, शिरूर अनंतपाळसह ग्रामीण भागातील बसेस सुरू आहेत. मराठा आंदोलनामुळे खबरदारी राज्य परिवहन महामंडळाने नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली. लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेसचाही यात समावेश आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपाेषणाला बसल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ मराठवाड्यात विविध ठिकाणी आंदोलने, मोर्चे काढली जात आहेत. त्यामुळे शुक्रवारीही लातूर आगारातून लांब पल्ल्याच्या सर्व बसेस डेपोतच थांबविण्यात आल्या होत्या. शनिवारीही जिल्ह्याबाहेर जाणारी सर्व बसेस थांबविण्यात आली आहेत.

खबरदारी म्हणून महामंडळाचा निर्णय...मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे खबरदारी म्हणून दोन दिवसांपासून लांब पल्ल्याच्या बसेस थांबविण्यात आल्या आहेत. शुक्रवारी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या ५० फेऱ्या रद्द केल्या होत्या. शनिवारी तर विभागातून ६०३ फेऱ्या झाल्या आहेत. यात महामंडळाचा २० लाख ४ हजार ९६० रूपयांचा व्यवसाय बुडाला आहे. - संदीप पडवळ, जिल्हा वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ.

टॅग्स :laturलातूरMaratha Reservationमराठा आरक्षण