शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

चापोलीतील ५१ शेतकरी कर्ज मुक्तीच्या प्रतीक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST

चापोली : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली जात आहे. योजनेला दीड वर्ष होत आले ...

चापोली : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली जात आहे. योजनेला दीड वर्ष होत आले असले तरी चापोली येथील ५१ शेतकरी कर्जमुक्ती पासून वंचित आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. त्यात २ लाख रुपयांपर्यंत थकीत असलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज या मर्यादा आणि १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ अशी कालमर्यादा ठेवण्यात आली. कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट भरणार होते. राष्ट्रीयीकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती बँका, ग्रामीण बँका, विविध सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्जाची माफी होणार होती. प्रसिद्ध झालेल्या यादीपैकी चापोलीसह परिसरातील जिल्हा मध्यवर्ती बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक यामध्ये ३९६ शेतकरी पात्र आहेत. त्यात ३४५ थकबाकीदार पात्र होते. त्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमुक्तीचे १ कोटी ५९ लाख ५७ हजार २६० रुपये जमा झाले आहेत. त्यातील ३७६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले. तर, २० शेतकऱ्यांनी केले नाही. पात्र ५१ थकबाकीदार शेतकरी हे कर्जमुक्तीसाठी पात्र असूनही अद्यापही त्यांच्या खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा झालेली नाही. २७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले असून, कर्जमुक्तीची रक्कम अद्यापपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही.

प्रोत्साहनपर अनुदान कधी मिळणार...

राज्य शासनाने २ लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची घोषणा केली. मात्र, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार असल्याचे घोषित केले. दीड वर्ष उलटूनही नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या चापोलीसह परिसरातील ७४५ शेतकऱ्यांच्या हातात दमडीही पडली नाही. त्यामुळे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ठेंगा दाखवला असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

अजूनही कर्जमुक्ती मिळण्याची प्रतीक्षा...

कर्जमुक्ती साठी प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये नाव होते. आधार प्रमाणीकरणही केले. मात्र, राज्य शासनाकडून पीक कर्जमुक्तीची रक्कम बँक कर्ज खात्यात अद्यापही जमा झालेली नाही. कर्जमुक्तीच्या योजनेच्या घोषणेला दोन वर्षे होत आले तरीही अजून कर्जमुक्ती झालेली नाही. त्यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत.

- बाबूराव तरगुडे, शेतकरी