शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

चापोलीतील ५१ शेतकरी कर्ज मुक्तीच्या प्रतीक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST

चापोली : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली जात आहे. योजनेला दीड वर्ष होत आले ...

चापोली : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली जात आहे. योजनेला दीड वर्ष होत आले असले तरी चापोली येथील ५१ शेतकरी कर्जमुक्ती पासून वंचित आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. त्यात २ लाख रुपयांपर्यंत थकीत असलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज या मर्यादा आणि १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ अशी कालमर्यादा ठेवण्यात आली. कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट भरणार होते. राष्ट्रीयीकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती बँका, ग्रामीण बँका, विविध सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्जाची माफी होणार होती. प्रसिद्ध झालेल्या यादीपैकी चापोलीसह परिसरातील जिल्हा मध्यवर्ती बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक यामध्ये ३९६ शेतकरी पात्र आहेत. त्यात ३४५ थकबाकीदार पात्र होते. त्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमुक्तीचे १ कोटी ५९ लाख ५७ हजार २६० रुपये जमा झाले आहेत. त्यातील ३७६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले. तर, २० शेतकऱ्यांनी केले नाही. पात्र ५१ थकबाकीदार शेतकरी हे कर्जमुक्तीसाठी पात्र असूनही अद्यापही त्यांच्या खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा झालेली नाही. २७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले असून, कर्जमुक्तीची रक्कम अद्यापपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही.

प्रोत्साहनपर अनुदान कधी मिळणार...

राज्य शासनाने २ लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची घोषणा केली. मात्र, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार असल्याचे घोषित केले. दीड वर्ष उलटूनही नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या चापोलीसह परिसरातील ७४५ शेतकऱ्यांच्या हातात दमडीही पडली नाही. त्यामुळे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ठेंगा दाखवला असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

अजूनही कर्जमुक्ती मिळण्याची प्रतीक्षा...

कर्जमुक्ती साठी प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये नाव होते. आधार प्रमाणीकरणही केले. मात्र, राज्य शासनाकडून पीक कर्जमुक्तीची रक्कम बँक कर्ज खात्यात अद्यापही जमा झालेली नाही. कर्जमुक्तीच्या योजनेच्या घोषणेला दोन वर्षे होत आले तरीही अजून कर्जमुक्ती झालेली नाही. त्यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत.

- बाबूराव तरगुडे, शेतकरी