शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
2
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
3
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
4
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
5
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
8
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
9
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
10
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
11
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
12
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
13
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
14
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
15
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
16
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
17
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
18
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
19
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
20
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!

पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

लातूर : जिल्ह्यात १५ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. प्रारंभी शाळांमध्ये शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती करण्यात आली ...

लातूर : जिल्ह्यात १५ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. प्रारंभी शाळांमध्ये शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती करण्यात आली होती. मात्र शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांना ५० टक्के तर दहावी आणि बारावीच्या शिक्षकांना निकालाच्या कामामुळे शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्याबाबत शाळांना आदेशित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषद, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, कनिष्ठ महाविद्यालय अशा सर्व मिळून २,७१५ शाळा आहेत. यामध्ये जवळपास २० हजारांहून अधिक शिक्षक अध्यापनाचे कार्य करतात. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंदच असल्या तरी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू होता. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. शाळांमध्ये विद्यार्थी येण्याबाबत निर्णय झाला नसला तरी शिक्षकांना उपस्थितीबाबत सूचित करण्यात आले आहे. प्रारंभी शंभर टक्के उपस्थितीबाबत सुचविण्यात आले होते. मात्र शिक्षणाधिकारी यांच्या १५ जूनच्या आदेशानुसार शाळेची वेळ १० ते ४.३० पर्यंत असेल. तसेच पहिली ते नववी शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के तर दहावीची उपस्थिती १०० टक्के राहणार आहे.

जिल्ह्यातील शाळा २,७१५

जि.प. शाळा १,२८४

माध्यमिक शाळा ५७०

कनिष्ठ महाविद्यालय २००

पहिली ते बारावीचे शिक्षक २०,७००

कोट

शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार पहिली ते नववीच्या शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के करण्यात आली आहे. तसेच दहावीच्या निकालाची तयारी सुरू असल्याने शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे. याबाबत शाळांना आणि मुख्याध्यापकांना सूचना करण्यात आल्या आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. - विशाल दशवंत, शिक्षणाधिकारी

संचालकांच्या पत्रात काय

शिक्षण संचालक कार्यालयाच्या वतीने १४ जून रोजी शाळा सुरू करण्याबाबत आदेश काढण्यात आले होते. त्यानुसार पहिली ते नववी आणि अकरावी ५० टक्के तर दहावी, बारावी १०० टक्के शिक्षक उपस्थिती

कोविड-१९ परिस्थितीमुळे शाळा बंद असल्या तरी शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवावे.

प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी शंभर टक्के उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचेही शिक्षण संचालकांच्या आदेशात म्हटले आहे.

जि.प. शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र

प्रारंभी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ११ जून रोजी शंभर टक्के उपस्थितीबाबत सूचना केल्या होत्या. मात्र शिक्षण संचालकांच्या १४ जूनच्या पत्रानंतर १५ जून रोजी नवीन आदेश शिक्षण विभागाने काढले.

त्यानुसार शाळेची वेळ १० ते ४.३० ठरवून देण्यात आली. तसेच पहिली ते नववी ५० टक्के आणि अकरावी व बारावी शिक्षक उपस्थिती शंभर टक्के करण्यात आली.

शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती १०० टक्के तर ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू ठेवण्याच्या सूचनाही जि.प. शिक्षणाधिकारी यांच्या आदेशात करण्यात आल्या आहेत.

उपस्थितीबाबत योग्य निर्णय

सध्या पहिली ते नववीच्या शाळांचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. त्यामुळे पहिली ते नववी शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के करण्याचा निर्णय योग्य आहे. दरम्यान, दहावीचा निकालाच्या अनुषंगाने शिक्षक तयारी करीत आहेत. - सोनेराव बेलुरे, शिक्षक

कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. सध्या जि.प. शाळाही सुरू झाल्या आहेत. पहिली ते नववी शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के करण्यात आली. हा निर्णय चांगला आहे. - रवींद्र गोसावी, शिक्षक