शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यातील ५०३ गावांतील टंचाई निवारणासाठी ४ कोटींचा कृती आराखडा !

By संदीप शिंदे | Updated: February 21, 2023 19:30 IST

प्रस्तावित उपाययोजना : अधिग्रहणावर होणार सर्वाधिक खर्च

लातूर : फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा पारा वाढत चालला आहे. नदी, नाले कोरेडे पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने संभावित पाणीटंचाई लक्षात घेऊन कृती आराखडा तयार केला आहे. यात जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जुन या दोन टप्प्यात आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ३८४ गावे व ११० वाड्यांना मिळून एकूण ५०३ गाव-तांड्यावर पाणीपुरवठ्यासाठी ४ कोटी १६ लाख ३५ हजार रुपये विविध उपाययाेजनांसाठी खर्च करण्यात येणार आहेत.. या आराखड्यात सर्वाधिक १ कोटी ७७ लाख ७० हजार रुपयांचा खर्च हा खासगी विहीरी व विंधन विहीरीच्या अधिग्रहणासाठी करण्यात येणार आहे. दरवर्षी उन्हाळ्यात काही गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. त्यावर उपाय म्हणून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, मागील दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होत असल्याने टँकरची आवश्यकता भासली नाही. यावर्षीही तशी शक्यता नाही. मात्र, प्रशासनाकडून खबरदारी म्हणून टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत ७४ गावे, २९ वाड्यांवर विविध उपाययोजनांसाठी १ कोटी ९४ लाख ७८ हजार रुपये खर्च होणार आहेत. तर एप्रिल ते जून यादरम्यान ३१० गावे, ८१ वाड्या मिळून एकूण ४०० गाव-वाड्यांवर पाणी टंचाई निर्माण झाल्यास २ कोटी २१ लाख ५७ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.

अधिग्रहणासाठी पावणेदोन कोटी...संभावित टंचाई कृती आराखड्यात सर्वाधिक १ कोटी ७७ लाख ७० हजार रुपये अधिग्रहणावर खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय टँकरने पाणीपुरवठा करणे, विंधन विहीरी घेणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहीरीची तात्पुरती दुरुस्ती, पुरक नळ योजना करणे, प्रगतीपथावरील नळ योजना पुर्ण करणे, विहीरीची खोली वाढविणे, गाळ काढणे, बुडक्या घेणे आदी विविध उपाययोजनांवर निधी खर्च केला जाणार आहे.

दोन टप्प्यात होणार अंमलबजावणी...जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला असून, यावर जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून या दोन टप्प्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यास अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात विविध उपाययोजनेतंर्गत नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी १ कोटी ६ लाख, टॅकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी २५ लाख २० हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर