शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

साकोळ प्रकल्पाची ३८ लाख ५० हजारांची पाणीपट्टी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:20 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील साकोळ मध्यम प्रकल्प मागील तीन- चार वर्षांपासून भरला नव्हता. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीस अडचणी येत होत्या. ...

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील साकोळ मध्यम प्रकल्प मागील तीन- चार वर्षांपासून भरला नव्हता. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीस अडचणी येत होत्या. परिणामी, प्रकल्पाची ३८ लाख ५० हजारांची पाणीपट्टी थकीत राहिली होती. दरम्यान, यंदा परतीच्या पावसामुळे साकोळ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला. त्यामुळे मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात नवीन उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली असल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने वसुली पथक सज्ज केले आहे. मार्चअखेरपर्यंत १५ लाख पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट प्रकल्प शाखेस देण्यात आले आहे.

तालुक्यातील साकोळ मध्यम प्रकल्प परिसरातील गावांसाठी वरदान ठरला असून, प्रकल्पाच्या पाणीसाठ्यावर शेकडो हेक्टर्स जमीन सिंचनाखाली आली आहे. पाणीपुरवठा योजनेसह बागायती शेतीला प्रकल्पाचा मोठा फायदा होत आहे. मात्र, मागील तीन- चार वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानामुळे मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडला होता. त्यामुळे पाणीपट्टी वसुली थांबली होती. मध्यम प्रकल्पाची ३८ लाख ५० हजारांची पाणीपट्टी थकीत राहिली आहे. यामध्ये मध्यम प्रकल्पावरून कार्यान्वित करण्यात आलेल्या वलांडीसह नऊ गाव पाणीपुरवठा योजनेचा समावेश आहे.

यंदा परतीच्या पावसामुळे साकोळ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला. परिणामी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टर्सवर उसाची लागवड केली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या प्रकल्प शाखेच्या वतीने थकीत पाणीपट्टीच्या वसुलीसाठी पथक सज्ज केले आहे. या पथकास मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत १५ लाख रुपये पाणीपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. वसुली पथकातील अधिकारी, कर्मचारी वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी रात्रंदिवस थकबाकीदाराच्या घरी खेटे घालीत आहेत.

आजपर्यंत १३ लाख ६९ हजारांची वसुली...

पाणीपट्टी वसुलीसाठी प्रकल्प शाखेच्या वतीने अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक सज्ज करण्यात आले असून, यामध्ये शाखाधिकारी प्रभाकर पाटील, कर्मचारी चंद्रहास माने, कुमार पाटील, बसवराज बिराजदार यांचा समावेश आहे. या पथकाने आजपर्यंत १३ लाख ६९ हजार रुपये वसुली केली आहे. उद्दिष्टाच्या जवळपास ९० टक्के वसुली झाली आहे.

मार्चअखेर व सणांमुळे सलग तीन सुट्या आल्याने शंभर टक्के वसुलीसाठी अडचण येत आहे. वसुलीसाठी थकबाकीदारांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे शाखाधिकारी प्रभाकर पाटील यांनी सांगितले.