शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

प्रोत्साहन अनुदानाचे ३६९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर !

By संदीप शिंदे | Updated: March 16, 2023 17:58 IST

१ लाख १३ हजार लाभार्थी, ४२५७ जणांची ई-केवायसी रखडली

लातूर : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. जिल्ह्यात १ लाख ८५ हजार ७४ लाभार्थी असून, यातील १ लाख १३ हजार २०२ लाभार्थ्यांच्या खात्यावर ३६९ कोटी ११ लाखांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. तर ई-केवायसी केली नसल्याने ४२५७ शेतकरी प्रोत्साहनच्या लाभापासून वंचित आहेत.

तीन वर्षे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यात १ लाख ८५ हजार ७४ लाभार्थी आहेत. यातील १ लाख ३१ हजार ८३० शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक मिळालेला असून, १ लाख २७ हजार ५७३ शेतकऱ्यांनी आधार ई-केवायसी केली आहे. तर ४ हजार २५७ जणांनी ई-केवायसीकडे पाठ फिरविली आहे. पहिल्या यादीत ४८ हजार, दुसऱ्या यादीत ८३ हजार शेतकऱ्यांची नावे आली आहेत. तर तिसरी यादी जाहीर होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाबाबत ७७२ शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या असून, जिल्हास्तरावर २९९ तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. तसचे तहसीलस्तरावर ३११ तक्रारी सोडविण्यात आल्या असून, ८१ तक्रारी रखडलेल्या आहेत. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत २ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्यात आले होते. मात्र, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत देण्यात आली नव्हती. त्यामुळे शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले होते. आता तिसरी यादी जाहीर होणार असून, सर्व प्रक्रिया विशिष्ठ क्रमांकावर सुरु असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.

ई-केवायसी तातडीने करुन घ्यावी...लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदान जमा होण्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे. आतापर्यंत १ लाख २७ हजार ५७३ जणांनी ई-केवायसी केली असून, ४ हजार २५७ शेतकऱ्यांनी अद्यापही केवायसी केलेली नाही. त्यामुळे योजनेच्या लाभापासून ते वंचित आहेत. ई-केवायसी केल्यास प्रोत्साहन अनुदानाची रक्कम खात्यावर वर्ग करण्यास मदत होणार आहे. - एस.आर. नाईकवाडी, जिल्हा उपनिबंधक

सव्वा लाख जणांना विशिष्ट क्रमांक...प्रोत्साहन अनुदानाची प्रक्रिया विशिष्ट क्रमांकावरच चालते. शेतकऱ्याचे नाव यादीत आल्यावर विशिष्ट क्रमांक दिला जातो. तो क्रमांक संबधित बँकेत दाखिवल्यावर प्रोत्साहनपोटी मिळणारी रक्कम दर्शविली जाते. त्याबद्दल शेतकऱ्याची तक्रार नसल्यास ही रक्कम खात्यावर वर्ग करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३१ हजार ८३० जणांना विशिष्ट क्रमांक मिळालेला आहे.

प्रोत्साहन अनुदानाची अशी आहे आकडेवारी...एकूण लाभार्थी - १,८५,०७४विशिष्ट क्रमांक मिळालेले - १,३१,८३०ई-केवायसी झालेले - १,२७,५७३ई-केवायसी रखडलेले - ४,२५७अनुदान मिळालेले - १,१३,२०२अनुदानपोटी रक्कम - ३६९.११ कोटी

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर