शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

लातूर जिल्ह्यात ई-पीक पाहणीकडे ३५ टक्के शेतकऱ्यांची पाठ !

By संदीप शिंदे | Updated: March 2, 2023 17:28 IST

दोनवेळा मुदतवाढ देऊनही नोंदणी रखडली

लातूर : शेतातील पिकाची माहिती ऑनलाईन नोंदविता यावी, पिकविमा, नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास शासकीय मदत देण्यासाठी सुसूत्रता यावी, यासाठी शासनाच्यावतीने ई-पीक पाहणीचा उपक्रम राबविण्यात आला होता. नोंदणीसाठी दोनवेळेस मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने जिल्ह्यात केवळ ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर ३५ टक्के शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीच केली नसल्याचे समोर आले आहे.

ई-पीक पाहणीमध्ये शेतकऱ्यांना मोबाईल ॲपद्वारे शेतातील पिकांचा फाेटो काढून अपलोड करावा लागणार होता. त्यानुसार कृषी, महसूल विभागाच्यावतीने जनजागृतीही करण्यात आली होती. जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणीसाठी ३ लाख ३४ हजार ६२ हेक्टर प्रस्तावित होते. यापैकी २ लाख १७ हजार ८०४ हेक्टरवर पीक पाहणी क्षेत्र मंजूर झाले होते. दरम्यान, जिल्ह्यात फेब्रुवारी अखेरपर्यंत ६५.२० टक्केच ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यात ७४ टक्के, उदगीर ७१, औसा ५८, चाकूर ६८, जळकोट ६२, देवणी ७१, निलंगा ५४, रेणापूर ७१, लातूर ६९, तर शिरुर अनंतपाळ तालुक्यात ७७ टक्के क्षेत्रावरील पाहणी पूर्ण झाली आहे.

ॲपद्वारे पिकांची अचूक नोंद...सातबारा उताऱ्यावर दरवर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकाची नोंद तलाठी, मंडल अधिकारी यांच्यातर्फे करण्यात येते. राज्य शासनातर्फे मागील वर्षीपासून ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक नोंदणी उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्ष शेतात जाऊन ॲपद्वारे फोटो अपलोड करावा लागत असल्याने पिकांची अचूक नोंद होत आहे. त्यामुळे पिकविमा, शासकीय अनुदान मिळण्यास अडचणी येणार नाही, हा उद्देश या ई-पीक पाहणीचा आहे.

नोंदणीत लातूर तालुका आघाडीवर...ई-पीक पाहणी हा शासनाच्यावतीने राबविण्यात येणारा उपक्रम असून, जनजागृतीसाठी महसूल प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक ई-पीक पाहणी लातूर तालुक्यात ७७.३६ टक्के झाली आहे, तर सर्वात कमी ई-पीक पाहणी निलंगा तालुक्यात झाली आहे. दरम्यान, शासनाकडून पाहणीसाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, तरीही अनेक शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीlaturलातूर