शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

चार महसूल मंडळातील २९ हजार शेतकऱ्यांना ३२ कोटींचा पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 17:44 IST

लातूर, औसा तालुक्यातील ५८ गावांचा समावेश 

ठळक मुद्दे२५ टक्यांपेक्षा कमी पेरणीचा निकष 

- संदीप शिंदे

लातूर : खरीप हंगामात पेरणी न झालेल्या लातूर जिल्ह्यातील दोन तालुक्यातील चार महसूल मंडळातील २९ हजार २१३ शेतकऱ्यांना ३२ कोटी ७३ लाख ४ हजार ३७६ रुपयांचा पीकविमा मिळाला आहे. संबंधित पीकविमा कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पेरणी न केलेल्या परंतु पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जुन-जुलै महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने लातूर व औसा तालुक्यातील अनेक गावांत खरीप पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे या भागात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली नव्हती. जवळपास ८० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र पेरणीविना राहिले होते. पेरणीपूर्व या भागातील शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. विमा भरल्यानंतर पेरणी झाली नाही तरी २५ टक्के पीकविमा देण्याची तरतुद आहे. त्यानुसार लातूर तालुक्यातील तांदुळजा महसूल मंडळातील ८ हजार ८११ शेतकऱ्यांना १२ कोटी ७६ हजार ४४५ रुपये, कन्हेरी महसूल मंडळातील ३ हजार ७१६ शेतकऱ्यांना ४ कोटी ९८ लाख ५९ हजार ८६१ रुपये तर औसा तालुक्यातील लामजना महसूल मंडळातील १० हजार ३१४ शेतकऱ्यांना ९ कोटी ९७ लाख ४९ हजार ३३० रुपये, किल्लारी महसूल मंडळातील ६ हजार ३७२ शेतकऱ्यांना ५ कोटी १० लाख ४८ हजार ७४० रुपये पीकविमा मंजूर करण्यात आला आहे. लातूर महसूल मंडळातील तांदुळजा आणि कन्हेरी या दोन महसूल मंडळातील तांदुळजा, टाकळगाव, कानडी बोरगाव, वांजरखेडा, सारसा, बोडका, गादवड, मसला, जवळगा बु, कासार जवळा, वाकडी, रामेश्वर, रुई, दिंडेगाव, गांजूर, ताडकी, भोसा, पिंपळगाव अंबा, कन्हेरी, वासनगाव, खोपगाव, पेठ, चांडेश्वर, कव्हा आणि कातपुर या गावांचा समावेश आहे. पिकविम्याची रक्कम संबंधित कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाल्याने दिलासा मिळाला असून, यामुळे रबी पेरणीसाठी आर्थिक मदत होणार आहे. 

औसा तालुक्यातील सर्वाधिक गावे...पेरणी न झालेल्या औसा तालुक्यातील दोन महसूल मंडळातील सर्वाधिक गावांना २५ टक्के पीकविमा मिळाला आहे. यामध्ये किल्लारी महसूल मंडळातील किल्लारी १, किल्लारी २, किल्लारीवाडी, हारेगाव, लिंबाळा दाऊ, संक्राळ, तळणी, बानेगाव, सिरसल, येळवट, चिंचोली जो, गोटेवाडी, कारला, पारधेवाडी तर लामजना महसूल मंडळातील लामजना, हटकरवाडी, दावतपुर, उत्का, खरोसा, रामेगाव, किनीवरे, तांबरवाडी, राजेवाडी, चिंचोली तपसे, जवळगा पो, गाढवेवाडी, मोगरगा, कुमठा, शिवणी लक, आनंदवाडी, रामवाडी, मंगरूळ या गावांचा समावेश आहे.

खरीप पिकविम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा...खरीप हंगामात जिल्ह्यातील ११ लाखहुन अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांना २५ टक्के पीकविमा मिळाला आहे. त्यामुळे पेरणी केलेल्या आणि पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना पिकविम्याची प्रतीक्षा आहे. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळू शकलेले नाही. परिणामी,  पिकविमा तरी लवकर मिळावा. अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. नुकसान झालेल्या पिकांचे सूचना पत्रही शेतकऱ्यांनी विमा कंपनीला भरून दिलेले आहे. त्यामुळे खरिपाचा पीकविमा कधी मिळणार असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :laturलातूरCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीagricultureशेती