शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

लातूरमध्ये २८२ गावांना स्मशानभूमीच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:21 IST

लातूर जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये स्मशानभूमीचा प्रश्न असून, काही गावांच्या स्मशानभूमीला रस्ताही नाही.

लातूर : लातूर जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये स्मशानभूमीचा प्रश्न असून, काही गावांच्या स्मशानभूमीला रस्ताही नाही. तर काही गावांत स्मशानभूमीच नाही. जागा, जमीन नसणा-या अनेक लोकांना अंत्यसंस्कार कोठे करावे, असा प्रश्न निर्माण होतो. जिल्ह्यात २८२ गावांत स्मशानभूमी नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर २६१ गावांमध्ये स्मशानभूमीला शेड नाही. त्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना अडचणी निर्माण होतात.‘एक गाव - एक स्मशानभूमी’ असा प्रयोग मागच्या काळात लातूर जिल्ह्यात राबविण्यात आला होता. ज्या गावात सर्व जाती-धर्मीयांसाठी एक स्मशानभूमी आहे, त्या गावात तत्कालीन खा. डॉ. जनार्दन वाघमारे यांनी मोठ्या प्रमाणात खासदार निधी दिला होता. स्मशानभूमीच्या रस्त्यासह स्मशानभूमीतील आसरा खासदार निधीतून करण्यात आला. शिवाय अशा गावांना बस थांब्यासाठीही शेड तयार करून दिले होते. आता सद्य:स्थितीत लातूर जिल्ह्यात २६१ गावांमध्ये स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीत शेड नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार करण्यास अडचणी निर्माण होतात. तर २८२ गावांमध्ये स्मशानभूमीच नाही. ज्यांना जागा-शेती आहे, ते तेथे त्यांच्या मयत नातेवाईकांचा अंत्यसंस्कार करतात. परंतु, ज्यांना जागाच नाही, त्यांना स्मशानभूमीची गरज वाटते. त्यामुळे २८२ गावांतील ग्रामपंचायतींनी स्मशानभूमीला जागा मिळावी म्हणून जिल्हा परिषदेला प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र त्या प्रस्तावांवर अद्याप चर्चा नाही. शिवाय, २६१ गावांत शेडचेही प्रस्ताव आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून स्मशानभूमीच्या जागेसाठी तसेच शेडसाठी तरतूद करावी, अशी मागणी काही ग्रामपंचायतींनी केली आहे. सिमेंट रस्ते व नाले बांधकामासाठी प्राधान्य... बहुतांश ग्रामपंचायती नियोजन समितीकडे गावातील रस्ते, सिमेंट नाले बांधकामासाठी कामे प्रस्तावीत करतात. परंतु, स्मशानभूमी व त्या विकासासाठी प्रस्ताव पाठविले जात नाहीत. शिवाय, नियोजन समिती अथवा शासनाकडूनही स्मशानभूमीचा प्रश्न अजेंड्यावर घेतला जात नाही. लातूर शहरालगत असलेल्या वाडी-वस्त्यांनाही स्मशानभूमीचा प्रश्न भेडसावत आहे. गाव तिथे स्मशानभूमी... गाव तिथे सार्वजनिक स्मशानभूमी असणे आवश्यक आहे. मात्र लातूर जिल्ह्यातील २८२ गावांमध्ये स्मशानभूमी नाही. तर अनेक गावांतील स्मशानभूमींना रस्ता नाही. ज्या गावात स्मशानभूमी नाही, अशा गावांतील लोक नदीकाठी, सार्वजनिक जागेत अंत्यसंस्कार करतात.