शहरं
Join us  
Trending Stories
1
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
2
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
3
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
4
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
5
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
6
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
7
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
8
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
9
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
10
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
11
धक्कादायक! प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या; मनोरंजन विश्वात खळबळ
12
खळबळजनक! वहिनीचं भयंकर 'सरप्राईज गिफ्ट'; नणंदेच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तव्याने केले ५० वार
13
IND vs SA: टी२० मध्ये सुपरफास्ट ४००० धावा, तिलक वर्माचा नवा विक्रम, विराटलाही टाकलं मागं!
14
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
15
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
16
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
17
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
18
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
19
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये २८२ गावांना स्मशानभूमीच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:21 IST

लातूर जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये स्मशानभूमीचा प्रश्न असून, काही गावांच्या स्मशानभूमीला रस्ताही नाही.

लातूर : लातूर जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये स्मशानभूमीचा प्रश्न असून, काही गावांच्या स्मशानभूमीला रस्ताही नाही. तर काही गावांत स्मशानभूमीच नाही. जागा, जमीन नसणा-या अनेक लोकांना अंत्यसंस्कार कोठे करावे, असा प्रश्न निर्माण होतो. जिल्ह्यात २८२ गावांत स्मशानभूमी नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर २६१ गावांमध्ये स्मशानभूमीला शेड नाही. त्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना अडचणी निर्माण होतात.‘एक गाव - एक स्मशानभूमी’ असा प्रयोग मागच्या काळात लातूर जिल्ह्यात राबविण्यात आला होता. ज्या गावात सर्व जाती-धर्मीयांसाठी एक स्मशानभूमी आहे, त्या गावात तत्कालीन खा. डॉ. जनार्दन वाघमारे यांनी मोठ्या प्रमाणात खासदार निधी दिला होता. स्मशानभूमीच्या रस्त्यासह स्मशानभूमीतील आसरा खासदार निधीतून करण्यात आला. शिवाय अशा गावांना बस थांब्यासाठीही शेड तयार करून दिले होते. आता सद्य:स्थितीत लातूर जिल्ह्यात २६१ गावांमध्ये स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीत शेड नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार करण्यास अडचणी निर्माण होतात. तर २८२ गावांमध्ये स्मशानभूमीच नाही. ज्यांना जागा-शेती आहे, ते तेथे त्यांच्या मयत नातेवाईकांचा अंत्यसंस्कार करतात. परंतु, ज्यांना जागाच नाही, त्यांना स्मशानभूमीची गरज वाटते. त्यामुळे २८२ गावांतील ग्रामपंचायतींनी स्मशानभूमीला जागा मिळावी म्हणून जिल्हा परिषदेला प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र त्या प्रस्तावांवर अद्याप चर्चा नाही. शिवाय, २६१ गावांत शेडचेही प्रस्ताव आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून स्मशानभूमीच्या जागेसाठी तसेच शेडसाठी तरतूद करावी, अशी मागणी काही ग्रामपंचायतींनी केली आहे. सिमेंट रस्ते व नाले बांधकामासाठी प्राधान्य... बहुतांश ग्रामपंचायती नियोजन समितीकडे गावातील रस्ते, सिमेंट नाले बांधकामासाठी कामे प्रस्तावीत करतात. परंतु, स्मशानभूमी व त्या विकासासाठी प्रस्ताव पाठविले जात नाहीत. शिवाय, नियोजन समिती अथवा शासनाकडूनही स्मशानभूमीचा प्रश्न अजेंड्यावर घेतला जात नाही. लातूर शहरालगत असलेल्या वाडी-वस्त्यांनाही स्मशानभूमीचा प्रश्न भेडसावत आहे. गाव तिथे स्मशानभूमी... गाव तिथे सार्वजनिक स्मशानभूमी असणे आवश्यक आहे. मात्र लातूर जिल्ह्यातील २८२ गावांमध्ये स्मशानभूमी नाही. तर अनेक गावांतील स्मशानभूमींना रस्ता नाही. ज्या गावात स्मशानभूमी नाही, अशा गावांतील लोक नदीकाठी, सार्वजनिक जागेत अंत्यसंस्कार करतात.