शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

संगायोच्या २४५ लाभार्थ्यांचे २८ लाख शासनाकडे परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST

जळकोट : संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांच्या २४५ लाभार्थ्यांचे २८ लाख रुपये अखर्चित राहिल्याने, तहसीलदारांच्या पत्रान्वये हे पैसे ...

जळकोट : संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांच्या २४५ लाभार्थ्यांचे २८ लाख रुपये अखर्चित राहिल्याने, तहसीलदारांच्या पत्रान्वये हे पैसे बँकेच्या व्यवस्थापकांनी शासनाकडे परत पाठविले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांतून संताप व्यक्त होत असून, सदरील अनुदान तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी भूमिहिन, विधवा, परित्यक्त्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्या अंतर्गत लाभार्थ्यांना मासिक अनुदान दिले जाते. या अनुदानावर लाभार्थ्यांना उदरनिर्वाह, दवाखाना, औषधोपचार करण्यास मदत होते. मात्र, येथील २४५ लाभार्थ्यांनी वेळेत अनुदान बँकेतून न उचल्यामुळे हे पैसे अखर्चित राहिले.

वास्तविक पाहता, या कालावधीत कोरोनाचा संसर्ग होता. त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे वाहनसेवा बंद होती. अशा परिस्थितीत काही जण आजारी पडले होते. त्यामुळे या लाभार्थ्यांना जळकोट येथे येणे शक्य झाले नाही, याशिवाय बहुतांश कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी संख्या कमीही होती. कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने बहुतांश लाभार्थ्यांनी बँकेत जाणे टाळले. वेळेत अनुदानाचे पैसे न उचलल्याने ते तहसीलदारांच्या पत्रान्वये बँकेने शासनाकडे परत केले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

तीन महिन्यांत पैसे न उचलल्याने परत...

शासनाच्या नियमानुसार, अनुदानाची रक्कम तीन महिन्यांच्या आत उचलणे आवश्यक आहे. ती न उचलल्यास शासनाकडे परत करावी लागते. त्यानुसार, आम्ही बँकांना पत्र दिले होते. त्यामुळे ही रक्कम परत करण्यात आली आहे.

- संदीप कुलकर्णी, तहसीलदार.

तहसीलदारांच्या पत्रानुसार पैसे परत...

तहसीलदारांच्या पत्रानुसार आपण ही रक्कम परत केली आहे. लाभार्थ्यांनी ठरावीक कालावधीत पैसे उचलणे आवश्यक आहे, परंतु ते न उचलल्याने ही कार्यवाही करावी लागली आहे. २४५ लाभार्थ्यांचे जवळपास २८ लाख परत केले आहेत, असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक लोखंडे यांनी सांगितले.

सहानुभूतीपूर्वक विचार करावा...

निराधारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाकडे परत पाठविलेले अनुदानाचे पैसे वाटप करावे. त्यांना नवीन फॉर्म भरण्यास सांगण्यात येऊ नये, अशी मागणी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संग्राम पाटील हसुळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, बाजार समितीचे संचालक गजानन दळवे पाटील, दिलीप कांबळे, खादरभाई लाटवाले, गोविंद माने, आयुब शेख यांनी केली आहे.