शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
5
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
6
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
7
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
8
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
9
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
10
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
11
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
12
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
13
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
14
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
15
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
16
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
17
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
18
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
19
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
20
Shirish Valsangkar: वळसंगकर रुग्णालयासह 'त्या' चारही डॉक्टरांची बँक खाती तपासा, मनीषा मानेचं पोलिसांना पत्र

संगायोच्या २४५ लाभार्थ्यांचे २८ लाख शासनाकडे परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST

जळकोट : संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांच्या २४५ लाभार्थ्यांचे २८ लाख रुपये अखर्चित राहिल्याने, तहसीलदारांच्या पत्रान्वये हे पैसे ...

जळकोट : संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांच्या २४५ लाभार्थ्यांचे २८ लाख रुपये अखर्चित राहिल्याने, तहसीलदारांच्या पत्रान्वये हे पैसे बँकेच्या व्यवस्थापकांनी शासनाकडे परत पाठविले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांतून संताप व्यक्त होत असून, सदरील अनुदान तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी भूमिहिन, विधवा, परित्यक्त्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्या अंतर्गत लाभार्थ्यांना मासिक अनुदान दिले जाते. या अनुदानावर लाभार्थ्यांना उदरनिर्वाह, दवाखाना, औषधोपचार करण्यास मदत होते. मात्र, येथील २४५ लाभार्थ्यांनी वेळेत अनुदान बँकेतून न उचल्यामुळे हे पैसे अखर्चित राहिले.

वास्तविक पाहता, या कालावधीत कोरोनाचा संसर्ग होता. त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे वाहनसेवा बंद होती. अशा परिस्थितीत काही जण आजारी पडले होते. त्यामुळे या लाभार्थ्यांना जळकोट येथे येणे शक्य झाले नाही, याशिवाय बहुतांश कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी संख्या कमीही होती. कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने बहुतांश लाभार्थ्यांनी बँकेत जाणे टाळले. वेळेत अनुदानाचे पैसे न उचलल्याने ते तहसीलदारांच्या पत्रान्वये बँकेने शासनाकडे परत केले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

तीन महिन्यांत पैसे न उचलल्याने परत...

शासनाच्या नियमानुसार, अनुदानाची रक्कम तीन महिन्यांच्या आत उचलणे आवश्यक आहे. ती न उचलल्यास शासनाकडे परत करावी लागते. त्यानुसार, आम्ही बँकांना पत्र दिले होते. त्यामुळे ही रक्कम परत करण्यात आली आहे.

- संदीप कुलकर्णी, तहसीलदार.

तहसीलदारांच्या पत्रानुसार पैसे परत...

तहसीलदारांच्या पत्रानुसार आपण ही रक्कम परत केली आहे. लाभार्थ्यांनी ठरावीक कालावधीत पैसे उचलणे आवश्यक आहे, परंतु ते न उचलल्याने ही कार्यवाही करावी लागली आहे. २४५ लाभार्थ्यांचे जवळपास २८ लाख परत केले आहेत, असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक लोखंडे यांनी सांगितले.

सहानुभूतीपूर्वक विचार करावा...

निराधारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाकडे परत पाठविलेले अनुदानाचे पैसे वाटप करावे. त्यांना नवीन फॉर्म भरण्यास सांगण्यात येऊ नये, अशी मागणी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संग्राम पाटील हसुळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, बाजार समितीचे संचालक गजानन दळवे पाटील, दिलीप कांबळे, खादरभाई लाटवाले, गोविंद माने, आयुब शेख यांनी केली आहे.