शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

गावच्या विकासास मिळणार चालना, लातूरातील ७८५ ग्रामपंचायतींसाठी २१ कोटींचे अनुदान

By हरी मोकाशे | Updated: March 4, 2024 18:44 IST

१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत अबंधित निधी

लातूर : गावागावातील ग्रामपंचायतस्तरावरील स्थानिक गरजा पूर्ण करुन नागरिकांना सेवा- सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत जिल्ह्यातील ७८५ ग्रामपंचायतींसाठी २० कोटी ९६ लाख ३४ हजारांचा अबंधित निधी केंद्र शासनाने उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायती मालमाल झाल्या असून गावच्या विकासास आणखीन चालना मिळणार आहे.

राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार एप्रिल २०२० पासून केंद्र शासनाकडून बंधित आणि अबंधित अशा दोन स्वरुपात निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. यात ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी प्रत्येकी १० टक्के निधी देण्यात येतो. बंधितसाठी ६० टक्के तर अंबधितसाठी ४० टक्के निधी दिला जातो. बंधित अनुदानाचा वापर स्वच्छता आणि हागणदारीमुक्त गाव, पाणीपुरवठा, जल पुर्नभरणसाठी तर अंबधितचा उपयोग ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन व अस्थापनाविषयीच्या बाबी वगळून इतर स्थानिक गरजांनुसार आवश्यक बाबींवर वापरता येतो. शिवाय, एकूण अनुदानाच्या २५ टक्के रक्कम आरोग्य, शिक्षण, उपजिविका, महिला व बालकल्याण, अनु. जाती व जमातीच्या घटकावर लोकसंख्येच्या प्रमाणात खर्च करणे आवश्यक आहे.

अबंधित निधीचा दुसरा हप्ता...१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज संस्थांना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अबंधित निधीच्या दुसऱ्या हप्त्यापोटील जिल्ह्यातील ७८५ ग्रामपंचायतींना २० कोटी ९६ लाख ३४ हजार रुपये केंद्र शासनाने उपलब्ध करुन दिले आहेत.

यापूर्वी ३६६ कोटींचा निधी...ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि प्रत्येक गावचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत १ एप्रिल २०२० पासून ३ मार्च २०२४ पर्यंत ३६६ कोटी १९ लाख ७१ हजार १६० रुपयांचा निधी मिळाला आहे. आता सोमवारी २० कोटी ९६ लाख ३४ हजारांचा निधी मिळाला आहे.

प्रशासकांमुळे निधीवर पाणी...जिल्हा परिषद आणि पंचायत समितीस प्रत्येकी १० टक्के निधी देण्यात येतो. दरम्यान, दोन वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रशासकराज आहे. त्यामुळे सन २०२२-२३ आणि २०२३- २४ या दाेन वर्षांतील अबंधितचे चार आणि बंधितचे चार हप्ते जमा करण्यात आले नाहीत. दाेन वर्षांपासून ग्रामपंचायतींस निधी दिला जात आहे.

वेळेत खर्च करावा...अबंधित निधीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम सोमवारी उपलब्ध झाली आहे. ती प्रत्येक ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा करणे सुरु आहे. ग्रामपंचायतींनी आराखड्यानुसार वेळेवर निधीचा वापर करावा.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतlaturलातूर