शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२०२ शेतकऱ्यांना महाबीजच्या सोयाबीन बियाणाने दिला दगा

By आशपाक पठाण | Updated: July 19, 2023 20:55 IST

तक्रारदाराचे पंचनामे, शेतकऱ्यांचे लाखाे रूपये मातीत

आशपाक पठाण, लातूर: यंदा पाऊस उशिरा आला, आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस पडताच खरिपाची पेरणी केली. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे असल्याने बाजारात विविध कंपन्यांची बियाणे विक्रीसाठी येतात. त्यात शेतकऱ्यांच्या मनात महाबीजची विश्वासार्हता अधिक असल्याने मोठ्या प्रमाणात पेरा झाला. मात्र, विश्वासाच्या कंपनीने दगा दिल्याने लातूर जिल्ह्यात २०२ शेतकऱ्यांनी महाबीज विराेधात कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.

उशिरा झालेल्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाणाची उगवण क्षमताही तपासून पाहिली नाही. विश्सासाने पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याने जिल्ह्यातील दोनशे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. औसा, निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. कुणाच्या एक, कुणाच्या दोन कुणाच्या तीन बॅगा उगवल्या नसल्याच्या तक्रारी आहेत. यातून शेकडो हेक्टर्समध्ये शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचा खर्च मातीत गेला आहे.

एकरी १५ हजारांचा खर्च...

खरीपात सोयाबीन पेरणीसाठी एकरी किमान १२ ते १५ हजार रूपये खर्च येतो. शिवाय, उशिरा पेरणी झाल्यावर उत्पादनात घट होते. महाबीज कंपनीचे बियाणे अनेक भागात उगवले नसल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप झाला आहे. त्याचबरोबर दुबार पेरणीमुळे आर्थिक फटका बसला आहे. कंपनीने तक्रारदार शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रूपये भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी केली आहे.

तक्रार देऊन आठ दिवस झाले....

औसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार देऊन आठ दिवस लोटले तरी अद्यापही पंचनामे करण्यात आले नाहीत, असे तपसे चिंचोली, जवळगा पोमादेवी, दापेगाव, लामजना, गाडवेवाडी, भादा आदी गावातील शेतकरी रजनीकांत लोहारे,बबन स्वामी, शिवराज वडगावे, पंडित लोहारे, त्र्यंबक सुरवसे, शिवशंकर तुगावे, अंकुश पळसे, सिताराम यादव यांनी सांगितले.

कृषी विभागाकडून पंचनामे सुरू...

शेतकऱ्यांनी तक्रार दिल्यावर लागलीच पंचनामे केले जात आहे. यासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण समिती आहे. पंचनामा झाल्यावर शेतकऱ्यांना ग्राहक मंचात दावा दाखल करता येतो. तालुका कृषी विभागाकडून आलेले अहवाल एकत्रित करून आम्ही महाबीज कंपनीच्या अकोला येथील कार्यालयाकडे पाठविणार आहोत. बियाणे कोणत्या कारणाने उगवले नाही, हे पंचनाम्यानंतर स्पष्ट होते. जिल्ह्यातून २०२ शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या आहेत. यात औसा, निलंग्यातील शेतकरी जास्त आहेत. -रक्षा शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Farmerशेतकरी