शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार ९६८ विद्यार्थी थेट दुसरीच्या वर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

चापोली : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मार्च २०२० मध्ये पहिले लॉकडाऊन झाले. त्यामुळे इयत्ता पहिली ...

चापोली : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मार्च २०२० मध्ये पहिले लॉकडाऊन झाले. त्यामुळे इयत्ता पहिली ते ९ वी च्या वर्गातील विद्यार्थी परीक्षा न देता उत्तीर्ण झाले. दरम्यान, पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेले तालुक्यातील २ हजार ९६८ विद्यार्थी प्रत्यक्षात एकही दिवस शाळेतील वर्गात न जाता दुसरीच्या वर्गात गेले आहेत.

गेल्या वर्षीपासून कोरोनाचे संकट सुरु असून त्याचा शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शाळा सुरु असल्या तरी प्रत्यक्षात वर्ग बंद असून ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरु आहे. पहिल्यांदाच बहुतांश विद्यार्थ्यांना मोबाईल, संगणकावर शिक्षण घ्यावे लागले आहे. इयत्ता पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शब्दाची ओळख नसतानाही ऑनलाईन अभ्यासक्रमात गुंतावे लागले. शाळा, वर्गमित्र, शिक्षक यातून बाराखडी, अक्षर ओळख, शाळेचे वातावरण या बाबींपासून पहिलीच्या विद्यार्थ्यांना मुकावे लागले. एकही दिवस शाळेत न जाता थेट दुसरीच्या वर्गात हे विद्यार्थी गेले आहेत.

गेल्या वर्षी चाकूर तालुक्यात मराठी माध्यमाचे २ हजार ४६९, उर्दू माध्यमाचे १५४, इंग्रजी माध्यमाचे ३४५ असे एकूण २ हजार ९६८ विद्यार्थ्यांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. आता हे सर्व परीक्षा न देता उत्तीर्ण होऊन दुसरीच्या वर्गात गेले आहेत. दरम्यान, या परिस्थितीमुळे पालकांची चिंता वाढली आहे.

शहरी भागातील काही पालकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पहिलीच्या वर्गातील शैक्षणिक पाया मजबूत न झाल्यामुळे ते पूर्ण कसे करतील, अशी चिंता पालकांना लागली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्षात वर्ग भरतील की नाही, हे सांगता येत नाही. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

शिक्षकांवर वाढणार ताण...

इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमाची तोंड ओळख करुन घेत विद्यार्थी दुसरीच्या वर्गात गेले आहेत. त्यामुळे या वर्गाचा अभ्यासक्रम सुरू करताना शिक्षकांपुढे विविध प्रश्न निर्माण होत आहेत. शिक्षकांना प्रथम पहिलीच्या अभ्यासक्रमाची पार्श्वभूमी शिकविल्यानंतर दुसरीचा अभ्यासक्रम सुरु करावा लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण पडणार आहे.

ब्रिज कोर्सचा उपक्रम...

गतवर्षी मार्चमध्ये कोविडमुळे लॉकडाऊन झाले आणि नवीन शैक्षणिक वर्षाला जूनपासून सुरूवात झाली. त्यामुळे गतवर्षी पहिलीच्या वर्गात प्रवेश न करता विद्यार्थ्यांना दुसरीत जावे लागत आहे. या विद्यार्थ्यांसाठी राज्य शिक्षण विभागाने ब्रिज कोर्सचा उपक्रम काढला आहे, असे प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय आलमले यांनी सांगितले.