शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

५३ हजार शेतकऱ्यांना १८२ कोटींचा 'प्रोत्साहन' लाभ

By संदीप शिंदे | Updated: February 4, 2023 11:46 IST

१ लाख ३१ हजार जणांना विशिष्ट क्रमांक : ५६५३ जणांची ईकेवायसी रखडली

लातूर : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात १ लाख ८४ हजार ५५६ पात्र शेतकरी असून, आतापर्यंत दुसऱ्या टप्प्यात १ लाख ३१ हजार २४४ जणांची यादी जाहीर झाली आहे. पैकी ५३ हजार २३४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १८२ कोटी ५१ लाखांचे प्रोत्साहन अनुदान वर्ग करण्यात आले आहे.

२०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१ या तीन वर्षांमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. जिल्ह्यात १ लाख ८४ हजार ५५६ लाभार्थ्यांची यादी उपनिबंधक कार्यालयाकडून शासनाकडे पाठविण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या यादी ४८ हजार शेतकऱ्यांची नावे आली होती. त्यापैकी ४५ हजार शेतकऱ्यांना १५२ कोटींचे वितरण झाले होते. आता दुसऱ्या यादीत ८३ हजार शेतकऱ्यांची नावे आली असून, ही संख्या १ लाख ३१ हजार २४४ वर पोहचली आहे. यापैकी १ लाख २५ हजार ५९१ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली असून, त्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ५३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १८२ कोटी ५१ लाख रुपयांचे अनुदान शासनाकडून वर्ग करण्यात आले आहे. दरम्यान, ही सर्व प्रक्रिया विशिष्ट क्रमांकावरच चालते. यादीमध्ये नाव आल्यानंतर शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक दिला जातो. संबंधित बँकेत जाऊन शेतकऱ्यांना ई-केवायसी केल्यावर प्रोत्साहनसाठी मिळणारी रक्कम सांगितली जाते. ती मंजूर असल्यासच शेतकरी प्रोत्साहनसाठी सहमत असल्याचे कळवितात. त्यानंतर काही दिवसांतच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते.

तिसरी यादी केव्हा जाहीर होणार?गेल्या चार महिन्यांपासून प्रोत्साहन अनुदानाची प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या यादीत ४८ हजार, दुसऱ्या यादीत ८३ हजार शेतकऱ्यांची नावे आली आहेत. तर अद्यापही ५३ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, तिसऱ्या यादीत या शेतकऱ्यांना नाव येण्याची प्रतीक्षा असली तरी तिसरी यादी कधी जाहीर होणार असा प्रश्न लाभार्थ्यांमधून विचारला जात आहे.

तहसीलस्तरावर १३८ तक्रारी दाखल...प्रोत्साहन अनुदानाबाबत शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम मंजूर नसल्यास त्याबाबत तहसीलस्तरावर तक्रार करण्याची मुभा आहे. त्यानुसार जिल्ह्यात तहसीलस्तरावर १३८ तक्रारी आल्या असून, १८७ तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. तर डीएलसी स्तरावर २६८ तक्रारी रखडल्या असून, १०२ तक्रारी सोडविण्यात आले असल्याचे उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.

ईकेवायसी करण्याचे प्रशासनाचे आवाहन...जिल्ह्यात प्रोत्साहन अनुदानासाठी १ लाख ८४ हजार ५५६ पात्र लाभार्थी आहेत. यातील १ लाख ३१ हजार २४४ जणांना विशिष्ट क्रमांक मिळाला असून, १ लाख २५ हजार ५९१ जणांची ई-केवायसी झालेली आहे. तर ५ हजार ६५३ शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेली नसल्याने ते अनुदानापासून वंचित आहे. त्यामुळे लवकरात लवकर ई-केवायसी करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक एस.आर. नाईकवाडी यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीlaturलातूर