शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

लातूरमध्ये जलजीवन मिशनची दीड हजार कोटींची कामे निकृृष्ट

By आशपाक पठाण | Updated: August 20, 2023 17:28 IST

विशेष समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याची खासदार सुधाकर शृंगारे यांची मागणी

आशपाक पठाण/ लातूरलातूर : केंद्र सरकार पुरस्कृत असलेल्या जलजीवन मिशन योजनेची लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास १ हजार ५०० कोटी रुपयांची कामे सुरू असून, यापैकी बऱ्याच कामांमध्ये कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले आहे. या कामाची विशेष समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये सध्या जलजीवन मिशनची कामे सुरू असून, या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये नळजोडणी आणि त्याद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचा व्यापक उद्देश सरकारचा आहे. मात्र, जिल्ह्यातील जलजीवन मिशन विभागातील अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार यांनी मिळून अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे केली आहेत तसेच काही ठिकाणी कामे पूर्ण न करता संपूर्ण बिले काढून कामे अपूर्ण ठेवली आहेत. हा प्रकार अत्यंत घृणास्पद असून, याबाबत समिती नेमून सखोल चौकशी करावी आणि झालेल्या चौकशीचा अहवाल मला तत्काळ पाठवावा, असे निर्देश खा. सुधाकर शृंगारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

अधिकारी, ठेकेदारांची मिलिभगत...

लातूर जिल्ह्यातील जलजीवन मिशनचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी मिळून या कामांबाबतचा दर्जा अत्यंत निकृष्ट केलेला असून यामुळे या योजनेचा व्यापक दृष्टिकोन खालावत असून देशातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी मिळण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या जनकल्याणकारी योजनेचा जर कोणी गैरवापर करत असेल तर त्यांना माफ करणार नाही असेही खासदार सुधाकर शृंगारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी