शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

रेणा प्रकल्पात १४.७६ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:23 IST

रेणापूर : पावसाळ्यातील अडीच महिने उलटले असले तरी तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. पावसाळ्यात केवळ ८ ...

रेणापूर : पावसाळ्यातील अडीच महिने उलटले असले तरी तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. पावसाळ्यात केवळ ८ टक्के पाणीसाठा जमा झाला असून सध्या प्रकल्पात १४.७६ टक्के जलसाठा आहे. हा जलसाठा केवळ पाणीपुरवठा योजनेसाठी पुरेल एवढाच आहे. सिंचनासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

रेणापूर तालुक्यासाठी रेणा मध्यम प्रकल्प हा वरदान आहे. मात्र, हा प्रकल्प गेल्या पाच वर्षांत केवळ एकदा पूर्ण क्षमतेने भरला होता. प्रकल्पाची क्षमता २१.६ दलघमी एवढी आहे. प्रकल्पावर रेणापूर तालुक्यातील निम्मी गावे तसेच अंबाजोगाई तालुक्यातील १७ गावांसाठीची जलयोजना आहे. त्याचबरोबर सिंचनासाठी ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ होतो. गतवर्षी प्रकल्पात कमी जलसाठा झाला होता. याही वर्षी धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने केवळ यंदा आठ टक्के जलसाठा वाढला असून १४.७६ टक्के झाला आहे.

सध्या प्रकल्पात ४.१५ दलघमी जलसाठा आहे. त्यात ३.२७ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. उपलब्ध पाणीसाठा प्रकल्पावर असणाऱ्या पाणी पुरवठा योजनांसाठी पुरेसा आहे. मात्र, शेती सिंचनासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे प्रकल्प क्षेत्रात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. पावसाळ्यातील अडीच महिने उलटले आहेत. त्यामुळे यंदा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरेल की नाही, याची शाश्वती नाही.

रेणा प्रकल्पावरून रेणापूर शहर पूरक पाणी पुरवठा योजना, पानगाव दहा खेडी, बिटरगाव पाच खेडी व अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव १७ खेडी या योजना कार्यान्वित आहेत. प्रकल्पात मे ते जून महिन्यात ६ ते ७ टक्के पाणीसाठा होता. यंदा त्यात ७ ते ८ टक्क्यांची भर पडून १४.७६ टक्के सध्या जलसाठा झाला आहे. या प्रकल्पाच्या भरोशावर परिसरातील शेतकरी उसाची लागवड करतात. जलसाठा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

आतापर्यंत ४९१ मिमी पाऊस...

रेणापूर तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी ६३४.९९ मिमी आहे. रेणापूर ६१६, पानगाव ३७९, कारेपूर ५०१, पळशी ५०९, पोहरेगाव ४५२ मिमी असा पाच महसूल मंडळात एकूण सरासरी ४९१.४ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस एकूण सरासरीच्या ८० टक्के झाला आहे. एवढा पाऊस झाला असला तरी अद्याप रेणा मध्यम प्रकल्पात म्हणावा तसा पाणीसाठा झाला नाही.

३.२७ दलघमी जिवंत पाणी...

धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे रेणा मध्यम प्रकल्पात कमी पाणीसाठा झाला आहे. सध्या प्रकल्पात १४.७६ टक्के साठा उपलब्ध आहे. म्हणजेच एकूण पाणीसाठा हा ४.१५६ दलघमी तर जिवंत पाणीसाठा ३.२७ दलघमी आहे. जलसाठा वाढण्यासाठी या क्षेत्रात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे, असे रेणा मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीधर कुलकर्णी यांनी सांगितले.