शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

रेणा प्रकल्पात १४.७६ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:23 IST

रेणापूर : पावसाळ्यातील अडीच महिने उलटले असले तरी तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. पावसाळ्यात केवळ ८ ...

रेणापूर : पावसाळ्यातील अडीच महिने उलटले असले तरी तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. पावसाळ्यात केवळ ८ टक्के पाणीसाठा जमा झाला असून सध्या प्रकल्पात १४.७६ टक्के जलसाठा आहे. हा जलसाठा केवळ पाणीपुरवठा योजनेसाठी पुरेल एवढाच आहे. सिंचनासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

रेणापूर तालुक्यासाठी रेणा मध्यम प्रकल्प हा वरदान आहे. मात्र, हा प्रकल्प गेल्या पाच वर्षांत केवळ एकदा पूर्ण क्षमतेने भरला होता. प्रकल्पाची क्षमता २१.६ दलघमी एवढी आहे. प्रकल्पावर रेणापूर तालुक्यातील निम्मी गावे तसेच अंबाजोगाई तालुक्यातील १७ गावांसाठीची जलयोजना आहे. त्याचबरोबर सिंचनासाठी ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ होतो. गतवर्षी प्रकल्पात कमी जलसाठा झाला होता. याही वर्षी धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने केवळ यंदा आठ टक्के जलसाठा वाढला असून १४.७६ टक्के झाला आहे.

सध्या प्रकल्पात ४.१५ दलघमी जलसाठा आहे. त्यात ३.२७ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. उपलब्ध पाणीसाठा प्रकल्पावर असणाऱ्या पाणी पुरवठा योजनांसाठी पुरेसा आहे. मात्र, शेती सिंचनासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे प्रकल्प क्षेत्रात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. पावसाळ्यातील अडीच महिने उलटले आहेत. त्यामुळे यंदा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरेल की नाही, याची शाश्वती नाही.

रेणा प्रकल्पावरून रेणापूर शहर पूरक पाणी पुरवठा योजना, पानगाव दहा खेडी, बिटरगाव पाच खेडी व अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव १७ खेडी या योजना कार्यान्वित आहेत. प्रकल्पात मे ते जून महिन्यात ६ ते ७ टक्के पाणीसाठा होता. यंदा त्यात ७ ते ८ टक्क्यांची भर पडून १४.७६ टक्के सध्या जलसाठा झाला आहे. या प्रकल्पाच्या भरोशावर परिसरातील शेतकरी उसाची लागवड करतात. जलसाठा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

आतापर्यंत ४९१ मिमी पाऊस...

रेणापूर तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी ६३४.९९ मिमी आहे. रेणापूर ६१६, पानगाव ३७९, कारेपूर ५०१, पळशी ५०९, पोहरेगाव ४५२ मिमी असा पाच महसूल मंडळात एकूण सरासरी ४९१.४ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस एकूण सरासरीच्या ८० टक्के झाला आहे. एवढा पाऊस झाला असला तरी अद्याप रेणा मध्यम प्रकल्पात म्हणावा तसा पाणीसाठा झाला नाही.

३.२७ दलघमी जिवंत पाणी...

धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे रेणा मध्यम प्रकल्पात कमी पाणीसाठा झाला आहे. सध्या प्रकल्पात १४.७६ टक्के साठा उपलब्ध आहे. म्हणजेच एकूण पाणीसाठा हा ४.१५६ दलघमी तर जिवंत पाणीसाठा ३.२७ दलघमी आहे. जलसाठा वाढण्यासाठी या क्षेत्रात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे, असे रेणा मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीधर कुलकर्णी यांनी सांगितले.