शहरं
Join us  
Trending Stories
1
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
2
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
3
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
4
'श्रीमंत' बनेल तुमचं मूल, या ६ मार्गांनी 'सुरक्षा कवच' तयार करा; महागाई देखील मार्ग अडवू शकणार नाही
5
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
6
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
7
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
8
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
9
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
10
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
11
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
12
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
13
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
14
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
15
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
16
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
17
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
18
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
19
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
20
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद

१३६२ शेतकऱ्यांची अनुदानासाठी धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:59 IST

शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय म्हणून बहुतांश शेतकरी शेती करण्यास धजावत नाहीत. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत शेतीस फटका बसतो. पाण्याचे ...

शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय म्हणून बहुतांश शेतकरी शेती करण्यास धजावत नाहीत. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत शेतीस फटका बसतो. पाण्याचे प्रमाण कमी असल्याने शेती उत्पादनात वाढ होत नाही. त्यामुळे शेती करण्याकडे युवा शेतकरी धजावत नसल्याचे पाहून केंद्र शासनाने सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून गेल्या काही वर्षापासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत ठिबक व तुषारला अनुदान देण्यात येते. त्यात अल्पभुधारक आणि बहुभुधारक शेतकऱ्यांना कमी जास्त प्रमाणात अनुदान आहे.

या योजनेमुळे सिंचनाच्या क्षेत्रात वाढ होण्यास मदत झाली असली तरी अनुदान मात्र वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची फरफट होत असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावाधाव सुरु आहे.

अनुदान मिळण्यात आहेत अडचणी

दरवर्षी शासनाकडून उशिरा अनुदान उपलब्ध करून देण्यात येत असल्याने विलंबाने शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अद्याप अनुदान उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे गतवर्षीच्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला नाही.

५५%

मिळते अनुदान

ठिबकसाठी अल्पभुधारक शेतकऱ्यास हेक्टरी ६१ हजाराचे अनुदान मिळत असले तरी प्रत्यक्षात १ लाख १२ हजारापर्यंत खर्च होतो. तसेच तुषारसाठी हेक्टरी १२ हजार ४५ रुपयांचे अनुदान देण्यात येते. प्रत्यक्षात २८ हजारांपेक्षा अधिक खर्च होतो. साधारणत: ५५ टक्के अनुदान मिळते.

शेतातील पाण्याचा योग्य वापर व्हावा तसेच शेती उत्पादन वाढावे म्हणून गेल्या वर्षी ३० हजार रुपये खर्च करून तुषार योजना राबविली. मात्र अद्यापही अनुदान मिळाले नाही. वर्षभरापासून पाठपुरावा सुरु आहे.

- बालाजी पाटील, शेतकरी

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा शासनाकडून अनुदान उपलब्ध झाले नाही. १३६२ शेतकऱ्यांच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. निधी उपलब्ध होताच तात्काळ तो खात्यावर वर्ग करण्यात येईल.

- दत्तात्रय गावसाने, जिल्हा कृषी अधिकारी