शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

लातूर जिल्ह्यात घरपट्टी, पाणीपट्टीचे १३ काेटी ६६ लाख थकित!

By हरी मोकाशे | Updated: March 14, 2024 17:39 IST

जिल्हा परिषद : गावागावांत विशेष कर वसुली पंधरवाडा

लातूर : प्रत्येक गावांतील नागरिकांना मुलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायतींकडून घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले जाते. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन स्वाभिमान मोहीमही राबविण्यात आली. त्यामुळे वसुलीस गती मिळाली असली तरीही आणखीन १३ कोटी ६६ लाख ११ हजारांची थकबाकी शिल्लक आहे. ती वसूल करण्यासाठी आता विशेष कर वसूली पंधरवाडा राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

प्रत्येक गावच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अधिकाधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. मात्र, नियम, अटी आणि काही तांत्रिक बाबींमुळे गावातील सर्व भागांचा अपेक्षित विकास साधणे अडचणीचे ठरते. अशावेळी पाणीपट्टी, घरपट्टी कर वसुली अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यातून ग्रामपंचायतीही आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते.

जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतींची घरपट्टी, पाणीपट्टीची शंभर टक्के वसूली व्हावी म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे अधिकाधिक कर वसूली झाली आहे.

एकूण कर : ६२,५६,२४,०००आतापर्यंतची वसुली : ४८,९०,१३,०००थकित रक्कम : १३,६६,११,०००

पावणेचार कोटींच्या घरपट्टीची थकबाकी...तालुका - थकित रक्कमअहमदपूर - ५७ लाख ४७ हजारऔसा - ५० लाख ७ हजारचाकूर - ३१ लाख २२ हजारदेवणी - २० लाख ५४ हजारजळकोट - १३ लाख ९३ हजारलातूर - ६९ लाख ८२ हजारनिलंगा - ५७ लाख ६१ हजाररेणापूर - २२ लाख ५२ हजारशिरुर अनं. - ११ लाख ६२ हजारउदगीर - ३७ लाख ५२ हजारएकूण - ३ कोटी ७२ लाख ३२ हजार

पाणीपट्टीपोटीच्या १० कोटी रुपयांच्या वसुलीचे आव्हान...तालुका - थकित रक्कमअहमदपूर - ६७ लाख ४८ हजारऔसा - १ कोटी ३८ लाखचाकूर - ४८ लाख ९९ हजारदेवणी - २२ लाख २२ हजारजळकोट - १६ लाख ९३ हजारलातूर - ८२ लाख ३४ हजारनिलंगा - १ कोटी ११ लाखरेणापूर - ४० लाख ५३ हजारशिरुर अनं. - २० लाख ७८ हजारउदगीर - ६८ लाख ७४ हजारएकूण - ९ कोटी ९३ लाख

विभागीय आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी...जिल्ह्यात विशेष कर वसुली मोहीम राबवून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, फेब्रुवारी अखेरपर्यंत कर वसुलीचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा कमी दिसून येत असल्याने विभागीय आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर वसुली ही ग्रामपंचायतीची नियमित बाब व मुलभूत कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

कर वसुलीसाठी विशेष मोहीम...ग्रामपंचायतींची १३ कोटी ६६ लाखांची कर वसुली थकित आहे. त्यासाठी १५ ते ३१ मार्च हा कालावधी विशेष कर वसुली पंधरवाडा म्हणून राबविण्याच्या सूचना बीडीओंना केल्या आहेत. शंभर टक्के कर वसुलीचे नियोजन करावे.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषदTaxकर