शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
4
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
5
व्लादिमीर पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
7
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
8
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
9
गांधी कुटुंब एकत्र भेटते, तेव्हा काय गप्पा रंगतात? प्रियंकांचा मुलगा रेहान वाड्रा म्हणतो...
10
बीएलएफने पाकिस्तानी सैन्यावर केला मोठा हल्ला; १० सैनिकांना मारल्याचा दावा
11
नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, "चौकशी करू..."
12
Pranjal Dahiya : Video - "ओ काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची..."; गैरवर्तनावर भडकली प्रसिद्ध गायिका
13
Aquarius Yearly Horoscope 2026: कुंभ राशीसाठी नवीन वर्ष 2026: आर्थिक चणचण संपणार! प्रवासातून भाग्योदय आणि सुखद बातम्यांचे वर्ष
14
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
15
Tiger Attack: वाघ गावात शिरला, तरुणावर हल्ला केला अन् पलंगावर आरामात झोपी गेला, पाहा Video...
16
'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
17
NMMC Election 2026: ...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
18
दोघांनी संसाराची स्वप्न बघितली, प्रेमविवाह केला पण भयंकर घडलं; पती-पत्नीमध्ये काय बिनसलं?
19
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
20
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
Daily Top 2Weekly Top 5

बाला उपक्रमाच्या दिशेने १२ शाळांचा वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे रूपडे पालटण्यासाठी ३५ शाळांची बाला उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. त्यापैकी १२ ...

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे रूपडे पालटण्यासाठी ३५ शाळांची बाला उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. त्यापैकी १२ शाळांची उपक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. कोराेनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे ओसरल्यानंतर विद्यार्थी शाळेत उपस्थित झाल्यानंतर ते आश्चर्यचकीत होणार आहेत, अशा पद्धतीने कामकाज सुरू आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून बाला उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शाळेतील प्रत्येक वस्तूवर विद्यार्थ्यांची नजर पडली तर त्यातून गणित, विज्ञान, इंग्रजी यासह सर्व विषयांचे ज्ञान लक्षात यावे, खेळता-खेळता शिक्षणाचे धडे मिळावेत म्हणून शिक्षणाशी निगडित असणाऱ्या प्रमुख २९ मुद्द्यांवर अधारित रंगरंगोटी, प्रतिकृती, माॅडेल, रॅम्प, ॲम्पिथिएटर, झोपाळा आदी साधनांची निर्मिती करून शालेय परिसर आकर्षक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६१ पैकी ३५ शाळांची पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने निवड केली. निवड करण्यात आलेल्या शाळांची बाला उपक्रमात अग्रेसर राहण्यासाठी वाटचाल सुरू झाली आहे.

तालुक्यातील या शाळांची निवड...

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६१ शाळा आहेत. त्यापैकी शिरुर अनंतपाळ केंद्रीय प्राथ. शाळा, कन्या शाळा, भोजराजनगर शाळा, दैठणा जिल्हा परिषद शाळा, तळेगावातील केंद्रीय प्रा. शाळा, डिगोळ येथील जिल्हा परिषद प्रा. शाळा, साकोळची कन्या शाळा, उत्तर शेंद येथील प्राथ. शाळा, साकोळची प्रशाला, येरोळ प्रशाला, उजेडची केंद्रीय शाळा, कांबळगाची केंद्रीय शाळा, लक्कड जवळगा येथील प्राथ. शाळा, शिवपूर प्राथ. शाळा, कळमगाव शाळा, बाकली प्राथ. शाळा, अंकुलगा राणी येथील प्राथ. शाळा, गणेशवाडी शाळा, हिप्पळगाव, अंकुलगा (स.), रापका शाळा आदी ३५ शाळांची निवड करण्यात आली आहे.

प्रभावी अंमलबजावणी...

तालुक्यातील बाला उपक्रमासाठी निवड करण्यात आलेल्या ३५ शाळांपैकी १२ शाळांनी उपक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. काही ठिकाणी ओटे बांधणे, झोपाळे बसविणे, प्रतिकृती तयार करणे, रंगरंगोटी करणे, रॅम्प, ॲम्पिथिएटर तयार करणे सुरू आहे. अंकुलगा राणी आणि डिगोळ या शाळांनी उपक्रमाची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे शाळांचे अंतरंग आणि बाह्यरंग बदलून गेले आहे. विद्यार्थीही शाळेत येण्यासाठी आतूर झाले आहेत.