शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

तांबाळ्यातील ११० शेतकरी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:57 IST

उस्तुरी : परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान, शासनाने अनुदान ...

उस्तुरी : परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान, शासनाने अनुदान जाहीर केले. मात्र, निलंगा तालुक्यातील ११० शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. निलंगा तालुक्यात परतीचा अतिपाऊस झाला. खरीप पिकांसह काही भागात जमिनीचेही नुकसान झाले. तालुक्यातील तांबाळा येथील १ हजार २६० शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आशा शासनाच्या मदतीकडे लागल्या. तेव्हा राज्य शासनाने अनुदान जाहीर केले. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. तांबाळा येथील १ हजार २६० पैकी केवळ १ हजार १५० शेतकऱ्यांना अनुदान जाहीर झाले आहे. अद्यापही येथील ११० शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त होत असून सातत्याने तलाठी सज्जाकडे चकरा मारत आहेत. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, येथील तलाठी विश्वनाथ तोंगरीकर म्हणाले, तांबाळा येथे एकूण १ हजार २६० शेतकरी आहेत. त्यापैकी १ हजार १५० शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली आहे. ११० शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.

कागदपत्रांची पूर्तता करावी...

येथील मंडळ अधिकारी ओ. बी. शेळके म्हणाले, काही शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही. त्यामुळे ते अनुदानापासून वंचित आहेत. सदरील शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांनाही अनुदानाचा लाभ मिळणार आहे.