शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

तांबाळ्यातील ११० शेतकरी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:57 IST

उस्तुरी : परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान, शासनाने अनुदान ...

उस्तुरी : परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान, शासनाने अनुदान जाहीर केले. मात्र, निलंगा तालुक्यातील ११० शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. निलंगा तालुक्यात परतीचा अतिपाऊस झाला. खरीप पिकांसह काही भागात जमिनीचेही नुकसान झाले. तालुक्यातील तांबाळा येथील १ हजार २६० शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आशा शासनाच्या मदतीकडे लागल्या. तेव्हा राज्य शासनाने अनुदान जाहीर केले. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. तांबाळा येथील १ हजार २६० पैकी केवळ १ हजार १५० शेतकऱ्यांना अनुदान जाहीर झाले आहे. अद्यापही येथील ११० शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त होत असून सातत्याने तलाठी सज्जाकडे चकरा मारत आहेत. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, येथील तलाठी विश्वनाथ तोंगरीकर म्हणाले, तांबाळा येथे एकूण १ हजार २६० शेतकरी आहेत. त्यापैकी १ हजार १५० शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली आहे. ११० शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.

कागदपत्रांची पूर्तता करावी...

येथील मंडळ अधिकारी ओ. बी. शेळके म्हणाले, काही शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही. त्यामुळे ते अनुदानापासून वंचित आहेत. सदरील शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांनाही अनुदानाचा लाभ मिळणार आहे.