शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

तांबाळ्यातील ११० शेतकरी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:57 IST

उस्तुरी : परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान, शासनाने अनुदान ...

उस्तुरी : परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान, शासनाने अनुदान जाहीर केले. मात्र, निलंगा तालुक्यातील ११० शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. निलंगा तालुक्यात परतीचा अतिपाऊस झाला. खरीप पिकांसह काही भागात जमिनीचेही नुकसान झाले. तालुक्यातील तांबाळा येथील १ हजार २६० शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आशा शासनाच्या मदतीकडे लागल्या. तेव्हा राज्य शासनाने अनुदान जाहीर केले. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. तांबाळा येथील १ हजार २६० पैकी केवळ १ हजार १५० शेतकऱ्यांना अनुदान जाहीर झाले आहे. अद्यापही येथील ११० शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त होत असून सातत्याने तलाठी सज्जाकडे चकरा मारत आहेत. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, येथील तलाठी विश्वनाथ तोंगरीकर म्हणाले, तांबाळा येथे एकूण १ हजार २६० शेतकरी आहेत. त्यापैकी १ हजार १५० शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली आहे. ११० शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.

कागदपत्रांची पूर्तता करावी...

येथील मंडळ अधिकारी ओ. बी. शेळके म्हणाले, काही शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही. त्यामुळे ते अनुदानापासून वंचित आहेत. सदरील शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांनाही अनुदानाचा लाभ मिळणार आहे.