शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लातूर जिल्ह्यातील १५३ केंद्रावर दहावीची कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा

By संदीप शिंदे | Updated: March 1, 2024 19:03 IST

विविध केंद्रावर पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेला शुक्रवारी सुरुवात झाली. पहिलाच मराठीचा पेपर कॉपीमुक्त वातावरणात जिल्ह्यातील १५३ केंद्रावर पार पडला. दरम्यान, ३९ हजारांवर विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले असून, विविध केंद्रावर पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवित स्वागत करण्यात आले.

दहावीच्या लेखी परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. लातूर जिल्ह्यातील ३९ हजार ७१ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. बोर्डाच्या वतीने १५३ केंद्रांचे नियोजन करण्यात आले. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकांनी विविध केंद्रांना भेटी देत तपासणी केली. लातूर तालुक्यातील बोरी येथील केंद्रावर एक कॉपीकेस सापडली. त्या व्यतिरिक्त सर्व केंद्रावर शांततेत परीक्षा झाली.

शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मराठी विषयाचा पेपर झाला. लातूर विभागीय मंडळ आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने २२ परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच २९ भरारी पथके नियुक्त होती. लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी विविध केंद्रांना भेटी देत तपासणी केली. यंदा विद्यार्थ्यांना १० मिनिटांचा अतिरिक्त वेळही देण्यात आला. लातूर तालुक्यात ५१ केंद्रांवर १४,०६५, औसा १३ केंद्रांवर ३,१०४, निलंगा १६ केंद्रांवर ४,००१, शिरूर अनंतपाळ ४ केंद्रांवर ८४३, देवणी ६ केंद्रांवर १,२९३, उदगीर २५ केंद्रांवर ६,०६९, जळकोट ४ केंद्रांवर १,००२, अहमदपूर १९ केंद्रांवर ४,६४४ आणि रेणापूर तालुक्यातील ६ केंद्रांवर १ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

टॅग्स :laturलातूरexamपरीक्षा