शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

जिल्हा परिषदेस सहा महिन्यांत दमडीही नाही-- सदस्यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:35 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन सहा महिने उलटून गेले तरी मतदारसंघात काम करण्यासाठी एक दमडीही मिळाली नसल्याने सर्वच सदस्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. त्यातच ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने ‘आधीच निधीचा उल्हास आणि त्यात आचारसंहितेचा फाल्गुन मास’ अशी आता अवस्था निर्माण झाली आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणुका ...

ठळक मुद्दे: ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेने ‘आधीच निधीचा उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी अवस्थाजिल्हा परिषदेच्या निवडणुका फेबु्रवारीमध्ये झाल्या. सत्तासंघर्षात भाजप आणि मित्रपक्षांनी बाजी मारली; परंतु पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील भरीव निधी देण्याची सर्वांनाच अपेक्षा आहे

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन सहा महिने उलटून गेले तरी मतदारसंघात काम करण्यासाठी एक दमडीही मिळाली नसल्याने सर्वच सदस्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. त्यातच ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने ‘आधीच निधीचा उल्हास आणि त्यात आचारसंहितेचा फाल्गुन मास’ अशी आता अवस्था निर्माण झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुका फेबु्रवारीमध्ये झाल्या. सत्तासंघर्षात भाजप आणि मित्रपक्षांनी बाजी मारली; परंतु निधीच्या बाबतीत मात्र फारसे काही अजून हाताला लागलेले नाही. ६० ते ६५ लाख रुपयांचा अर्थसंकल्प यंदा २९ लाखांवर आला आहे. त्यातून प्रत्येक सदस्याला पाच लाखांच्या स्वनिधीची तरतूद झाली आहे. त्यातून आता मतदारसंघातील काही कामे सुचविण्यास सुरुवात केली आहे. तोपर्यंत ग्रामपंचायतीची आचारसंहिता सुरू झाली आहे.दुसरीकडे जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळणार या अपेक्षेने सर्वांच्या नजरा नियोजन समितीच्या बैठकीकडे लागून राहिल्या होत्या. जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजप सत्तेवर आल्याने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील भरीव निधी देण्याची सर्वांनाच अपेक्षा आहे. त्यातून शाळा दुरुस्तीपासून ते रस्त्यांची अनेक कामे मार्गी लागतील अशी सर्वांना आशा आहे.

याच दरम्यान, जिल्हा नियोजन समितीची निवडणूक लागल्याने त्यात महिनाभर गेला. ती निवड होऊन महिना उलटला तरी जिल्हा नियोजन समितीची बैठक झालेली नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आचारसंहिता एवढ्या तातडीने लागेल अशी कुणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे आठ-दहा दिवसांत ती बैठक घेऊन निधी वितरित करण्याबाबतचे नियोजन होते.मात्र, आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींसाठी १४ आॅक्टोबरलाच मतदान होणार असल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे त्याचाही कळत नकळत परिणाम होणार आहे. नियोजन समितीची बैठक होऊन मग निधी जिल्हा परिषदेला वर्ग करण्यात येणार आहे.ईर्ष्येने निवडून उपयोग काय?भाजपमुळे यंदा जिल्ह्यात अतिशय अटीतटीने लढती झाल्या. अनेक सदस्य पहिल्यांदाच जिल्हा परिषदेसाठी निवडून आले आहेत. त्यांना आपण मतदारसंघात काही तरी काम करीत आहोत हे दाखवायचे आहे. मात्र, जिल्हा परिषदेकडून निधीच आला नसल्याने काय काम करायचे, मतदारसंघातील ग्रामस्थांना काय उत्तर द्यायचे अशी कुचंबणा या सदस्यांची झाली आहे.शासनाची येणी संपल्याचाही परिणामशासनाच्या विविध विभागांकडून जिल्हा परिषदेचे कोट्यवधी रुपये येणे होते. गेल्या पाच-सहा वर्षांत हे पैसे जिल्हा परिषदेला मिळाल्याने एका वर्षी तर सदस्यांना दहा ते बारा लाख रुपयांचा स्वनिधी मिळाला. मात्र, आता पाच लाख रुपये मिळतानाही मारामार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.