शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांत मिळते वैद्यकीय बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांना उपचारानंतर शक्यतो तीन महिन्यांमध्ये बिले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांना उपचारानंतर शक्यतो तीन महिन्यांमध्ये बिले मंजूर करण्याची परंपरा कोल्हापूर जिल्हा परिषदेत पाळली जात आहे. मात्र, अपुरी कागदपत्रे आणि जादा रक्कम असेल तर मात्र त्यासाठी विलंब होत आहे. जानेवारी २० पासून नोव्हेंबरपर्यंत दाखल ८२७ प्रकरणांपैकी ७३१ देयके मंजूर करण्यात आली आहेत.

या कर्मचाऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या आजारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले, शस्त्रक्रिया झाली, मुलांवर उपचार झाले असतील तर त्याचे वैद्यकीय बिल शासनाकडून अदा केले जाते. मात्र, यासाठीची प्रक्रिया थोडी वेळखाऊ परंतु अत्यावश्यक अशी आहे. ज्या विभागाचा संबंधित अधिकारी, कर्मचारी असेल त्या विभागात सुरुवातीला याबाबतचा प्रस्ताव दाखल करावा लागतो.

या प्रस्तावासोबत रुग्णालयातील सर्व कागदपत्रे, औषधांची बिले सादर करावी लागतात. त्यासाठी सुरुवातीलाच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून छाननी करण्यात येते. यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव त्यांच्या विभागाकडून त्या काळामधील त्याची रजा, तो सेवेत आहे की कसे याची खातरजमा करण्यात येते.

यानंतर हा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे जातो. तेथे शासनाने ठरवून दिलेल्या आजारामध्ये संबंधिताचा आजार समाविष्ट आहे का याची खात्री केली जाते. त्यानंतर तो तांत्रिक मंजुरी देऊन वित्त विभागाकडे पाठविला जातो. तेथून तो पुन्हा संबंधिताच्या विभागाकडे येतो आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी जातो. प्रत्येक टप्प्यावर शासन निर्णयानुसार या प्रस्तावाची छाननी केली जाते. जर संंबंधित अधिकाऱ्यांना काही त्रुटी वाटल्या तर त्या दूर करण्यासाठी पत्रव्यवहार केला जातो. सर्व कागदपत्रे पूर्ण असतील तर मात्र प्रस्ताव दोन ते तीन महिन्यांमध्ये मंजूर केला जातो आणि निधी उपलब्ध झाल्यानुसार संबंधिताच्या खात्यावर रक्कम जमा केली जाते.

चौकट

२० टेबलवरून फिरते फाईल

सर्व विभागांकडून ही फाईल फिरत असताना एकूण २० टेबलवरून या प्रस्तावाचा प्रवास होतो. सुरुवातीलाच प्रस्ताव तयार करताना अनेकदा कागदपत्रे अपूर्ण असतात. त्यामुळे ती पूर्तता करेपर्यंत अनेकांचा जीव मेटाकुटीला येतो. अशातच मग काही टेबलच्या ठिकाणी आर्थिक अपेक्षाही व्यक्त केली जाते.

चौकट

११ महिन्यांत दाखल प्रस्ताव ८२७

देयके मंजूर ७३१

नामंजूर व त्रुटीचे प्रस्ताव ०९६

चौकट -

ज्या आजारांसाठी शासन बिले अदा करीत नाही अशा आजारासाठी प्रस्ताव करणे, चुकीची कागदपत्रे जोडणे, टॉनिकची बिले जोडणे, सर्व बिलांवर डॉक्टरांच्या सह्या नसणे अशा अनेक कारणांमुळे वैद्यकीय बिले नामंजूर होतात. अनेक कर्मचारी उशिरा प्रस्ताव दाखल करतात. त्यामुळे विलंब होतो.

कोट

चाळीस हजार रुपयांवरील वैद्यकीय बिलांचे अधिकार माझ्याकडे आहेत, तर तीन लाखांवरील बिलांचे अधिकार शासनाकडे आहेत. सुरुवातीलाच प्रस्ताव परिपूर्ण असतील तर अधिकाधिक तीन महिन्यांमध्ये प्रस्ताव मंजूर केले जातात आणि निधी उपलब्ध झाल्यानंतर रक्कम अदा केली जाते.

अमन मित्तल

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर.