शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

जिल्हा परिषदेच्या बजेटला कात्री

By admin | Updated: March 2, 2017 00:51 IST

सदस्यांचा अपेक्षाभंग : ६५ कोटींचा अर्थसंकल्प ३० कोटींवर येणार

समीर देशपांडे---कोल्हापूर--जिल्हा परिषदेकडून मोठा निधी आणून मतदारसंघात भरपूर कामे करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नूतन जिल्हा परिषद सदस्यांचा यंदा स्वप्नभंग होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ६०-६५ कोटींचा असणारा अर्थसंकल्प यंदा २५ कोटींपर्यंत खाली येण्याची शक्यता असल्याने सदस्यांना प्रसादासारखाच निधी मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद सदस्यांच्या मतदारसंघात किमान अडतीस हजार ते बेचाळीस हजार लोकसंख्या असते. छोटी गावे असतील तर गावांची संख्या वाढते आणि मोठी गावे असतील तर त्यांच्या गरजाही तितक्याच मोठ्या असतात. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य हे आपल्या मतदारसंघामध्ये मिळेल तेथून निधी कसा आणता येईल, यासाठी धडपडत असतात. त्यासाठी स्वनिधी हा त्यांच्या हक्काचा असतो. जिल्हा परिषदेचे उत्पन्न व खर्च यांतून उर्वरित रक्कम स्वनिधी म्हणून वापरण्यात येते व शक्यतो सर्व सदस्यांना हा निधी समप्रमाणात दिला जातो. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी अधिकचा निधी आपल्यासाठी वापरतात. सन २०१२-१३ साली जिल्हा परिषदेचे वार्षिक अंदाजपत्रक २७ कोटी ३३ लाख रुपयांचे होते; तर नंतर ते वाढत ६५ कोटींपर्यंत गेले. दोन वर्षे असा मोठा निधी मिळाला. त्यामुळे प्रत्येक सदस्याला किमान तीन वर्षे प्रत्येकी आठ ते दहा लाख रुपयांचा निधी मतदारसंघामध्ये कामे करण्यासाठी मिळाला. महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा परिषदेचे सुमारे ८० कोटी रुपये येणे होते. ते सलग दोन वर्षे आल्यामुळे अर्थसंकल्प ६५ कोटींपर्यंत गेला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतील योजनांची संख्याही वाढली. सदस्यांना चांगला निधीही मिळाला. मात्र, आता शासनाकडून जिल्हा परिषदेचे फारसे येणे नाही. त्यामुळे अर्थसंकल्पातील रक्कम झपाट्याने खाली येण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम सदस्यांच्या निधी वाटपावर होणार आहे. त्यामुळे आठ ते दहा-बारा लाखांपर्यंत प्रत्येक सदस्याला मिळणारा निधी आता प्रतिवर्षी तीन-चार लाखांपर्यंत खाली येऊ शकतो. सीईओ सादर करणार अर्थसंकल्पनुकतीच जिल्हा परिषदेची निवडणूक झाली आहे. अजून नवे सभागृह रीतसरपणे अस्तित्वात आलेले नाही. अशा परिस्थितीत सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार हे यंदाचा अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर पदाधिकारी निवडी झाल्यानंतर सभागृह अस्तित्वात येईल व नवे सभागृह या अर्थसंकल्पाला मान्यता देईल. जिल्हा परिषद अर्थसंकल्प आढावासनरक्कम२०१२/१३२७ कोटी ३३ लाख २०१३/१४६४ कोटी ९२ लाख२०१४/१५६५ कोटी ५७ लाख२०१५/१६४७ कोटी ०३ लाख२०१६/१७४१ कोटी ७३ लाख२०१७/१८ (संभाव्य)३० कोटी रुपयेगेली अनेक वर्षे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे महाराष्ट्र शासनाकडून जे येणे होते, ते दोन वर्षांपूर्वी मिळाले. त्या-त्या वेळी अंदाजपत्रकातील रक्कम वाढली. त्यानुसार जिल्हा परिषद सदस्यांनाही स्वनिधी चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देता आला. मात्र, आता शासकीय येणे फार नाही.- बाळासाहेब पाटील, प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी