शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

तरुणाईला पदभ्रमंती मोहिमांचे वेध

By admin | Updated: November 17, 2015 00:01 IST

दिवाळीची सुट्टी : कसबा बावड्यातून भटकंतीला जाणारे २0 गट

कसबा बावडा : दिवाळीच्या सुट्टीमुळे कसबा बावड्यातील हायकर्स ग्रुपना आता पदभ्रमंती मोहिमेचे वेध लागले असून त्याची तयारी आता सुरू झाली आहे. शुक्रवारी (दि. १३) दिवाळी-भाऊबीज सण झाल्यानंतर हायकर्स ग्रुप सह्याद्रीच्या कुशीत भटकंतीसाठी बाहेर पडणार आहेत. बावड्यातून प्रत्येकवर्षी दिवाळीच्या सुट्टीत भटकंतीसाठी जाणारे १५ ते २० ग्रुप आहेत. त्यात ज्येष्ठ नागरिकांचा ‘हनुमान हायकर्स ग्रुप’ आजही आघाडीवर आहे.पन्हाळा, गगनबावडा, दाजीपूर, वासोटा, रांगणा, विशाळगड, तिल्लारी, कडगाव-पारगाव, कास, महाबळेश्वर, जावळीचे खोरे, भैरवगड, आदी परिसरात भटकंती करण्यास तरुणाई जास्त पसंती देते. नुकतीच दिवाळी झाल्यामुळे या पदभ्रमंतीला काही ग्रुपनी सुरुवात केली आहे. शूज, सॅक, टोपी, कमरेला पाण्याची बाटली, हातात काठी, टी-शर्ट, जीन पँट किंवा बर्मुडा असा पोशाख परिधान करून तरुणाई पदभ्रमंतीला जात असते.सातारा जिल्ह्यातील वासोटा, जावळीचे खोरे तसेच कोयना परिसर पदभ्रमंतीसाठी मोठा आनंद देणारी ठिकाणे आहेत, पण तितकीच ती धोक्याचीसुद्धा आहेत. सलग दोन-तीन दिवस या जंगलात पदभ्रमंती करावी लागते. या जंगलात अस्वलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे चालण्याची तयारी, धाडस असणाऱ्यांनीच या पदभ्रमंतीसाठी बाहेर जावे, असे येथील नेहमी पदभ्रमंतीसाठी जाणाऱ्या अनेक युवकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पदभ्रमंतीमुळे निसर्गाशी जवळीक साधता येते. पानं, फुले, वेली विविध वृक्षांची माहिती होते. विविध प्राणी जवळून पाहावयास मिळतात. विषारी, बिनविषारी प्राण्याची माहिती एखाद्या वाटाड्याकडून आपणास मिळते. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर जंगलात आल्यामुळे मनाला समाधान मिळते, असे पदभ्रमंती करणाऱ्यांचे मत आहे. (प्रतिनिधी)माहिती सहज उपलब्धजंगल परिसरात भटकायचे कसे? काय पाहायचे? कोठे पाहायचे? जायचे कसे? तेथे धोका काय आहे? विविध किल्यांचा इतिहास, जाणाऱ्या वाटा यांची सविस्तर माहिती आता विविध लेखांमधून व पुस्तकांमधून मिळू लागल्याने भटकंती करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक ग्रुप आता पुढे आले आहेत.