शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

महिलांसह तरुणींचे जीवन असुरक्षित

By admin | Updated: September 5, 2014 00:34 IST

शहरात रोडरोमिओंचा उच्छाद : प्रतिकार करणाऱ्यांंवरच हल्ले; पोलीस मूग गिळून गप्प

एकनाथ पाटील -कोल्हापूर --चेन स्नॅचरच्या भीतीने महिला, तरुणींचे जीवन असुरक्षित असताना आता नवीन भयावह संकटांचा त्यांना सामना करावा लागत आहे. शहरातील कॉलेज, बसस्टॉप, आॅफिस, आदी परिसरात तरुणींसह महिलांच्या छेडछाडीचे प्रकार दिवसें-दिवस वाढत आहेत. दिवसा दुचाकीवरून घरापर्यंत पाठलाग करून तरुणींच्या मनावर दडपणाचा प्रयत्न होत आहे. त्यांना प्रतिकार करणाऱ्यांंवर जीवघेणा हल्ला केला जात आहे. कायदा व्यवस्था निष्क्रिय बनली. न्यायव्यवस्थेमध्ये दाद मिळेलच याचा विश्वास नसल्याने त्या तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. रोडरोमिआेंच्या उच्छादाने शहरातील पावित्र्य नष्ट होत आहे. पोलीस मात्र बघ्याची भूमिका बजावित असल्याचे भयावह चित्र शहरात दिसते. शहरात दिवसा-ढवळ्या चेन स्नॅचरकडून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारण्याचे प्रकार वाढत असताना दुसरीकडे रोडरोमिओंचा त्रास पाचविला पूजला आहे. राजारामपुरी येथील सायबर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीला एक सराईत गुंडाला तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तरुणीच्या समोरच त्या गुंडाची पोलीस ठाण्यात धुलाई केली. त्यानंतर श्रीमती सिंग व उपअधीक्षक वैशाली माने, महाविद्यालयावरच रोडरोमिओंची धरपकड करत चोप दिला. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही केली. अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी महिला व तरुणींसाठी महिला हेल्पलाईन सुरू केली. परंतु या पथकाचा धाक तरुणांच्या मनावर पडलेला नाही. बेफामपणे दुचाकी रस्त्यावर फिरवीत ते तरुणींसह महिलांचा पाठलाग करताना भयावह चित्र लोकांना दिसतेय. त्यांना रोखणाऱ्यावरच हल्ले करायलाही ते मागे पुढे बघत नाहीत. पंधरा दिवसांपूर्वी विवेकानंद कॉलेजमधील विद्यार्थिनीचा कळंब्यातील एका तरुणाने तिचा चक्क हात पकडून जबरदस्तीने गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला. उमा टॉकीज चौकात महिलेची गाडी अडवून तरुणाने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही घटना शाहूपुरी व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नोंद आहेत. पण त्यांना त्यांना समज देऊन सोडून देतात. धाक न राहिल्याने रोमिओंचे पुन्हा बेशिस्त वर्तन करू लागले आहेत. मनोबल वाढविण्याची गरज रोडरोमिओंच्या त्रासाने अनेक मुलींनी शाळा-कॉलेजलाच जाणे बंद केले. आज छेडछाड होऊनही एकही मुलगी तक्रार देण्यास पुढे येत नाही. त्यासाठी पोलीस प्रशासनाने मुलींचे मनोबल वाढविण्याची गरज आहे. - वर्षा संकपाळ (गृहिणी)तक्रारपेटीला वाली नाहीमहाविद्यालयात लेडीज रूममध्ये तक्रार पेट्या बसविल्या आहेत. तरुणींनी अगदी बिनधास्तपणे छेड काढणाऱ्या तरुणाचे नाव, फोन व दुचाकी नंबर लिहून चिठ्ठी तक्रारपेटीत टाकावी, अशी सूचना पोलीस व महाविद्यालय प्रशासनाकडून केली आहे. पंधरा दिवसांतून एकदा दोन पोलीस महाविद्यालयात जाऊन तक्रार पेटी उघडतात. परंतु या पेट्या उघडण्यास पोलीस जात नसल्याचा तक्रारी आहेत. कठोर पाऊल उचलण्याची गरज महिला व तरुणींची असुरक्षितता वाढली. एकीकडे उच्च, आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले. परंतु स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन तसाच आहे. त्याला सामाजिक मान्यता असल्यासारखे हे तरुण वागतात. एकतर्फी प्रेम करुन तरुणींना त्रास दिला जात आहे. हे रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलावीत. - डॉ. मेघा पानसरे (अध्यक्ष : अखिल भारतीय महिला फेडरेशन )