शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पंचगंगा नदीघाटावर आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 17:02 IST

यंदाचा पावसाळा व संभाव्य पूरस्थिती पाहता प्रशासनाच्या सज्जतेसाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फ़त आपत्ती व्यवस्थापनाकरिता उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामग्रीची बुधवारी पंचगंगा घाट येथे चाचणी घेण्यात आली.

ठळक मुद्देपूरस्थितीसाठी सज्ज आहातच, आता दक्ष राहा : आयुक्त कलशेट्टी यांचे आवाहन कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

कोल्हापूर : यंदाचा पावसाळा व संभाव्य पूरस्थिती पाहता प्रशासनाच्या सज्जतेसाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फ़त आपत्ती व्यवस्थापनाकरिता उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामग्रीची बुधवारी पंचगंगा घाट येथे चाचणी घेण्यात आली.

सज्ज आहातच; पण आता दक्ष रहा, असा संदेश महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बुधवारी आपत्ती व्यवस्थापन समितीला दिला. गतवर्षी अतिवृष्टी आणि महापुराच्या काळात महापालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगले काम केले, अशी कौतुकाची थापही त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पाठीवर दिली. त्यावेळी आयुक्त बोलत होते.अग्निशमन दलातर्फे रेस्क्यू बेल्ट, बीए सेट, पोर्टेबल पंप, फायर सुट, लाईफ जॅकेट, सेफ्टी नेट, लिफ्टिंग बॅग, हायड्रॉलिक स्प्रेडर कटर व जॅक, सॉ कटर, स्लॅब कटर, लाईफबॉय, मनिला रोप, फ्लोटिंग पंप, रबरी बोटी, लाईफ रिंग, इत्यादी साहित्याची पंचगंगा घाटावर यशस्वी चाचणी घेण्यात आली.

अग्निशमन विभागाच्या जवानांनी शोध व बचाव कसा करावा, बुडणाऱ्या व्यक्तींना कसे वाचवावे याची प्रात्यक्षिके दाखविली. यावेळी महापौर निलोफर आजरेकर यांनी मागील वर्षीचा पुराचा अनुभव पाहता या वर्षी महापालिकेने खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्या असल्याचे सांगितले.गतवर्षी पूरपरिस्थितीमध्ये अनेक सेवाभावी संस्था, नागरिकांनी सहकार्य केलेले आहे. त्याचप्रमाणे या वर्षीही संभाव्य पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.यावेळी उपायुक्त निखिल मोरे, साहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार, चेतन कोंडे, मुख्य अग्निशमन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रणजित चिले, स्थानक अधिकारी तानाजी कवाळे, मनीष रणभिसे, दस्तगीर मुल्ला, आश्पाक आजरेकर व अग्निशमन विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.दहा बोटी, ७५ लाईफ जॅकेट‌्सआयुक्त कलशेट्टी म्हणाले, महापालिकेकडे सात बोटी आहेत. आणखी तीन बोटी खरेदी करण्यात येत आहेत. त्या लवकरच महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे दाखल होत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी ७५ लाईफ जॅकेट घेतली आहेत. त्याचबरोबर संभाव्य पूर परिस्थती पाहता पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी नदीची इशारा पातळी ओलांडता जाताच तत्काळ स्थलांतरित व्हावे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर