शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

यंदाच्या हंगामात किमान हजार कोटींचा फटका

By admin | Updated: March 18, 2017 00:58 IST

साखर हंगाम आटोपला : पावणे चार कोटी टन गाळप कमी

विश्वास पाटील -- कोल्हापूर --राज्यातील राज्यातील साखर हंगाम आता आटोपला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल पावणे चार कोटी टनांचे गाळप कमी झाले. साखर उत्पादनातही ४३ लाख टनांचा फटका बसला. गतवर्षीचा विचार करता, यंदा हंगाम पन्नास टक्केच चालला. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना किमान एक हजार कोटी रुपयांचा फटका बसला. सुरुवातीला दुष्काळामुळे उसाची वाढ कमी व नंतर जास्त पाऊस झाल्याने खुंटलेली वाढ यांचा उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. राज्यात यंदा ८८ सहकारी व ६२ खासगी असे १५० कारखाने सुरू होते. १३ मार्चअखेर त्यांतील १४८ कारखाने बंद झाले. त्यांनी ३७१ लाख टनांचे गाळप केले असून, त्यातून ४१ लाख टन साखर उत्पादन झाले. यंदा सरासरी साखर उतारा ११.२३ राहिला. गतवर्षीच्या तुलनेत तो पॉइंट १० ने जास्त आहे. राज्यात सुमारे दहा लाख हेक्टर क्षेत्र उसाखाली आहे. त्यात फारसा फरक न पडताही पावसाने ओढ दिल्यामुळे ऊस उत्पादनात घट झाली. पुढील हंगामातही हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. ढोबळमानाने यंदाचा हंगाम फारसा वाद किंवा संघर्ष न होता झाला. किमान १२० दिवसांहून जास्त दिवस हंगाम झाला, तर कारखान्यांची स्थिती चांगली राहते; परंतु यंदा सरासरी हंगाम ३० ते ९० दिवस राहिला. बहुतांश कारखान्यांची नोव्हेंबरला सुरू झालेली धुराडी यंदा जानेवारीतच बंद झाली. काही कारखाने फेब्रुवारीत व अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच कारखाने मार्चमध्ये सुरू राहिले. सरासरी हंगाम, गाळप व साखर उत्पादन या तिन्ही टप्प्यांवर तो ५० टक्के कमी झाला. खोडवा पिकाची वाढच न झाल्याने यंदाच्या हंगामात मोठा फटका बसला. ऊस दिसायला चांगला होता; परंतु वजनात त्याचा फार फटका बसला. त्याचा सरासरी उत्पादनावर परिणाम झाला. एफआरपी वाढली; परंतु बाजारातील साखरेचे दर घसरल्याने शेतकरी संघटनांनीही पहिल्या उचलीसाठी फारसे ताणवून धरले नाही. कारखान्यांनी एफआरपी व जादा १७५ रुपये देण्याचे मान्य केल्यावर हंगाम सुरळीत झाला.दृष्टिक्षेपात महाराष्ट्राचा साखर उद्योगनोंदणीकृत कारखाने- २०२सुरू असलेले कारखाने (सहकारी व खासगी) - १७८ऊस उत्पादक शेतकरी - २६ लाख १२ हजारराज्य सरकारचे भाग भांडवल- १२५३ कोटीप्रतिदिन गाळप क्षमता- ५ लाख ५६ हजार टनडिस्टिलरी प्रकल्प - १०१सहवीज प्रकल्प - ७५वीजनिर्मिती मेगावॉट - १३५४पुढील हंगामात ६०० लाख टन गाळप व सुमारे ७२ लाख टन साखर उत्पादन असा प्राथमिक अंदाज व्यक्त झाला आहे. या हंगामात ४६० टन गाळप व ५२ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज होता. त्यामध्ये प्रत्यक्षात ९० लाख टन गाळप व १० लाख टन साखर उत्पादन कमी झाले.गेल्या पाच वर्षांतील गाळप व साखर उत्पादन लाख टनांमध्येवर्षगाळपसाखर उत्पादन२०१२-१३७२६७९२०१३-१४६७६७७२०१४-१५९३०१०५२०१५-१६७४१८४२०१६-१७३७१४१पुढील हंगामातही यंदाच्या हंगामापेक्षा फार वेगळी स्थिती असेल असे नाही. मान्सून कसा लाभतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. - विजय औताडे,व्यवस्थापकीय संचालक,शाहू साखर कारखाना कागल