शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

यशवंतराव चव्हाण महान होऊनही विनम्र

By admin | Updated: March 15, 2017 01:01 IST

विजय कुवळेकर : शिवाजी विद्यापीठात ‘ग्रंथांनी रचलेला महापुरुष : यशवंतराव चव्हाण’ ग्रंथाचे प्रकाशन

कोल्हापूर : सातत्यपूर्ण वाचनामुळेच यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिपादनात कधीही पुनरावृत्ती आढळत नाही. महान होऊनही विनम्र असण्याचे, संयत पद्धतीने व्यक्त होण्याचे मूळही त्यातच आढळते. वाचनानेच यशवंतरावांसारखा निष्कलंक चारित्र्याचा पारदर्शक आणि निखळ माणूस घडला, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी मंगळवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठातील यशवंतराव चव्हाण अध्यासन आणि आनंद ग्रंथसागर प्रकाशनातर्फे आयोजित डॉ. आनंद पाटील लिखित ‘ग्रंथांनी रचलेला महापुरुष : यशवंतराव चव्हाण’ या ग्रंथाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहातील कार्यक्रमास त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील हे प्रमुख उपस्थित, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. ज्येष्ठ पत्रकार कुवळेकर म्हणाले, सभ्यता, सुसंस्कृतता आणि अभिजातता यांचा तिहेरी संगम यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वात आढळतो. त्याचे प्रतिबिंब ‘ग्रंथांनी रचलेला महापुरुष’च्या पानोपानी आढळते. ग्रंथांतून वाचलेले तत्त्वज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करणारा नेता म्हणजे यशवंतराव होते. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, अप्रतिम वक्तृत्व आणि अफाट वाचन असणाऱ्या यशवंतरावांची कामगिरी अतुलनीय आहे. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, नीतिमूल्यांबद्दल अत्यंत आग्रही असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी तितक्याच सचोटीने विविध क्षेत्रांत कार्य केले. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. पाटील म्हणाले, चिरंतन विचार देणारा हा ग्रंथ असून डॉ. आनंद पाटील यांनी एक वेगळा ग्रंथ लिहिला आहे. कार्यक्रमात लेखक डॉ. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)वैचारिक, तत्वज्ञानदृष्ट्या समृद्धज्येष्ठ पत्रकार कुवळेकर म्हणाले, स्वखर्चाने आठ हजारांहून अधिक ग्रंथ खरेदी करून त्यांचे वाचन करणारा आणि त्यातून प्राप्त ज्ञानाचा आपल्या राष्ट्रासाठी वापर करणारा यशवंतरावांसारखा दुर्मीळ नेता आपल्याला लाभला. यशवंतरावांनी त्यांच्या हयातीत अनेक मोठमोठी पदे भूषविली. त्यातून ते आर्थिकदृष्ट्या श्रीमंत झाले नाहीत. तथापि, वाचनामुळे ते वैचारिक आणि तत्त्वज्ञानदृष्ट्या मात्र अत्यंत समृद्ध झाले.