शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

यड्रावकर यांना विधानसभेला रोखण्याची मोर्चेबांधणी, निमित्त जिल्हा बँकेचे : विरोधातील सर्व गटांनी बांधली मोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शिरोळ तालुक्यातील सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शिरोळ तालुक्यातील सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी तालुक्यातील त्यांच्या विरोधातील सर्व गट एकवटले आहेत. वरकरणी ही जिल्हा बँकेची लढाई असली तरी त्यामागे यड्रावकर यांना पुढील विधानसभा निवडणुकीत रोखण्याचीच मोर्चेबांधणी आहे. तालुक्यातील जिल्हा बँकेची मतांची संख्या पाहता यड्रावकर यांना रोखणे अशक्य असल्याचे चित्र दिसत आहे.

यड्रावकर मूळचे राष्ट्रवादीचे, परंतु शिरोळची विधानसभेची जागा दोन्ही काँग्रेसच्या आघाडीने स्वाभिमानी संघटनेला सोडली. त्यामुळे विधानसभेला यड्रावकर यांना बंडखोरी केली व विजय खेचून आणला. नुसते आमदार म्हणून ते थांबले नाहीत तर लगेच शिवसेनेला पाठिंबा दिला व जी काही ताकद वापरायची ती वापरून चक्क राज्यमंत्रीपद मिळवले. त्यांचे हे राजकीय वर्चस्व आताच रोखण्याची गरज तालुक्यातील सर्व विरोधकांना वाटते. आमदारकीचा रस्ता जिल्हा बँक व ‘गोकुळ’च्या सत्तेतून जातो. त्यामुळे जिल्हा बँकेत अगोदर त्यांना त्या सत्तेपासून बाजूला करण्यासाठी पारंपरिक विरोधक एकत्र आले आहेत. पण त्याच्या आड येणारी कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत.

१.शिरोळ तालुक्यात संस्था गटात १४९ मते आहेत. गेल्यावेळच्या निवडणुकीत राजेंद्र यड्रावकर यांच्या पाठीशी स्वाभिमानी, दिवंगत सा. रे. पाटील गट आणि आवाडे गट होता हे खरे असले तरी या तिन्ही गटांची मतांची ताकद मर्यादित आहे. शिवाय यड्रावकर हे तब्बल ५० मतांनी विजयी झाले आहेत.

२.जिल्हा बँक असो की गोकुळ, तिथे संचालक झाला की त्या संस्थांशी त्यांचा नित्य संपर्क येतो. त्यातून कामे करून दिली जातात. लोक जोडले जातात. ठराव कुणाच्या नावे करून घ्यायचे याची जोडणी आधीच लावली जाते. या कामात यड्रावकर आधीच फार पुढे गेले आहेत.

३. राज्यमंत्री यड्रावकर यांची येईल त्या व्यक्तीचे काम करून देण्याची पध्दत आहे. ते कुणासाठीही सहज उपलब्ध होतात. शिवाय त्यांनी गेल्या वर्षभरापासूनच या निवडणुकीची तयारी केली आहे. शिवाय मतदारांत ’गुंतवणूक’ही केली आहे.

४. यड्रावकर यांना जिल्हा बँकेच्या सत्तारुढ आघाडीतून बाजूला करणे पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाही शक्य नाही. कारण ते मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. संचालक म्हणून निवडून येण्याची त्यांची क्षमता आहे.

५. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीतील निर्णायक ५० मते राज्यमंत्री यड्रावकर गटाकडे आहेत. शिवाय अलीकडील काही महिन्यांत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. पालकमंत्री पाटील यांच्याविरोधातही त्यांना जिव्हारी लागणारी विधाने केली आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणून यड्रावकर यांना बाजूला करता येणे शक्य नाही.

६.राज्यमंत्री यड्रावकर यांची दुसरी फळी फारच सक्रिय आहे. आर्थिक व राजकीय सत्ता असल्याने सर्व पातळीवर जोडण्या लावण्याची त्यांची ताकद आहे. याउलट विरोधातील समझोत्याचे उमेदवार समजले जाणाऱ्या दत्त शिरोळ कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचा कारखाना, उदगाव बँक, तालुका खरेदी-विक्री संघाचा व्याप जास्त आहे. त्यांच्याकडे कुटुंबातील दुसऱ्या फळीतील पाठबळ अपुरे आहे. माजी आमदार उल्हास पाटील यांची जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील मतांची ताकद नगण्य आहे.

जिल्हा बँक निवडणुकीतील गतवेळचे चित्र

राजेंद्र पाटील यड्रावकर : ९७

विठ्ठलराव नाईक निंबाळकर : ४७

मतदान केले नाही : ०५

यड्रावकर तब्बल ५० मतांनी विजयी.

गत विधानसभा निवडणुकीतील चित्र

राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष) : ९० हजार ३८

उल्हास पाटील (शिवसेना) ) ६२ हजार २१४

सावकर मादनाईक (स्वाभिमानी) : ५१ हजार ८०४