शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

कोल्हापूरकर रमले फुलांच्या दुनियेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:50 IST

कोल्हापूर : मनाला प्रसन्न करणारी लाखो रंगीबेरंगी फुले, फुलांपासून केलेल्या आकर्षक रचना, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या पुतळ्यांना केलेली मनमोहक पुष्परचना आणि जिथे तिथे सेल्फी घेणारे हजारो नागरिक असे जल्लोषी वातावरण कोल्हापूरच्या पोलीस उद्यानामध्ये रविवारी अनुभवण्यास मिळाले. निमित्त होते कोल्हापुरात आयोजित ‘फ्लॉवर फेस्टिव्हल’चे.कोल्हापूर रस्ते विकास प्रकल्प (केएसबीपी)यांच्यावतीने महाराष्ट्रातील पहिला ...

कोल्हापूर : मनाला प्रसन्न करणारी लाखो रंगीबेरंगी फुले, फुलांपासून केलेल्या आकर्षक रचना, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या पुतळ्यांना केलेली मनमोहक पुष्परचना आणि जिथे तिथे सेल्फी घेणारे हजारो नागरिक असे जल्लोषी वातावरण कोल्हापूरच्या पोलीस उद्यानामध्ये रविवारी अनुभवण्यास मिळाले. निमित्त होते कोल्हापुरात आयोजित ‘फ्लॉवर फेस्टिव्हल’चे.कोल्हापूर रस्ते विकास प्रकल्प (केएसबीपी)यांच्यावतीने महाराष्ट्रातील पहिला ‘फ्लॉवर फेस्टिव्हल’ येथील पोलीस उद्यानामध्ये आयोजित करण्यात आला असून कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते रविवारी या फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आले.‘केएसबीपी’चे संचालक सुजय पित्रे म्हणाले, भारतातील निवडक ठिकाणी होणाºया फ्लॉवर फेस्टिव्हलमध्ये आता कोल्हापूरची भर पडली असून, इथल्या शेतकºयांना फूलशेतीला प्रोत्साहन देण्यासाठीही हा फेस्टिव्हल उपयुक्त ठरेल.यावेळी व्यासपीठावर अंजली पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजस्विनी सावंत, समीर दरेकर, संदीप देसाई उपस्थित होते. कार्यक्रमाला निवास साळोखे, अनुराधा भोसले, किशोर देशपांडे, अनंत खासबारदार, शिरीष खांडेकर, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, सिद्धार्थ लाटकर, सचिन शानबाग उपस्थित होते.फेबु्रवारीमध्ये कोल्हापुरात कलामहोत्सवआपल्या आगामी उपक्रमांची घोषणा करताना मंत्री पाटील म्हणाले, ९, १० व ११ फेब्रुवारी २०१८ रोजी कोल्हापूरमध्ये भव्य कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये दिग्गज कलाकार सहभागी होणार असून, रोज ५० हजार नागरिक याचा लाभ घेऊ शकतील. शिवाजी स्टेडियमवर हा महोत्सव होणार आहे. तसेच एप्रिल-मे महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्लक्षित पर्यटन ठिकाणे दाखविण्यासाठी कोल्हापूर दर्शन सहली आयोजित करण्यात येणार आहेत.आता शहरातील युवकांसाठी योजनागेल्या तीन वर्षांमध्ये शासनाने ग्रामीण भागातील शेतकºयांसाठी विविध योजना जाहीर केल्या. यापुढच्या काळात आता शहरातील युवक-युवतींसाठी विविध योजना सरकार सुरू करणार असून, त्यातून आपल्या कमाईचे समाधान त्यांना मिळविता येईल. आताच एक कर्ज योजनाही जाहीर करण्यात आल्याचे यावेळी मंत्री पाटील यांनी सांगितले.सेल्फी, फोटोसाठी प्रचंड गर्दीसंयोजकांनी या ठिकाणी सेल्फी पार्इंट विकसित केल्याने सेल्फी घेण्यासाठी नागरिकांनी, युवक-युवतींनी मोठी गर्दी केली होती. राधानगरी धरणाची प्रतिकृती, आईस कार्व्हिंग, स्वातंत्र्यसमराची माहिती देणारे फलक, मेक इन इंडियाची प्रतिकृती, विमानाची पुष्प प्रतिकृती या ठिकाणी नागरिकांनी फोटोसाठी मोठी गर्दी केली होती. पहिल्याच दिवशी नागरिकांनी फेस्टिव्हलमध्ये उत्स्फूर्त हजेरी लावली.नितीन देसार्इंनी पाठविल्या मूर्तीफेस्टिव्हल, मिरवणुकीमध्ये सादर केलेल्या सर्व मूर्ती, साहित्य कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी सुमारे १५ ट्रकमधून पाठविले आहे. मूर्तींमुळे फेस्टिव्हलला भव्यता आली.