शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीव -रसुरक्षा साधनांची वानवा : वर्षभरात विभागामध्ये १४ कामगार मृत, तर १८ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 01:10 IST

सतिश पाटील ।शिरोली : एमआयडीसीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या एक वर्षातील विविध अपघातात कोल्हापूर विभागात १४ कामगार मृत झाले; तर १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह फक्त नावालाच साजरा होतो. शिरोली एमआयडीसीमध्ये चार दिवसांपूर्वी झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात एका कामगाराला जीव गमवावा लागला, तर ...

सतिश पाटील ।शिरोली : एमआयडीसीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या एक वर्षातील विविध अपघातात कोल्हापूर विभागात १४ कामगार मृत झाले; तर १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह फक्त नावालाच साजरा होतो. शिरोली एमआयडीसीमध्ये चार दिवसांपूर्वी झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात एका कामगाराला जीव गमवावा लागला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अनुषंगाने औद्योगिक सुरक्षा कार्यालयाशी संपर्क साधला असता गेल्या वर्षभरात कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोल्हापूर विभागात झालेल्या अपघातात निष्पाप १४ कामगारांचा बळी गेला आहे, तर १८ कामगार गंभीर जखमी होऊन जायबंदी झाले आहेत .

पश्चिम महाराष्ट्र हा फौंड्री आणि कोकणच्या काजू उद्योगासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या पश्चिम महाराष्ट्रात सुमारे दहा हजारांहून अधिक कारखाने आहेत; पण औद्योगिक सुरक्षा कार्यालयाकडे फक्त तीन हजार कारखान्यांचीच नोंद आहे. उर्वरित कारखान्यांची नोंदच नाही. कंपनीत कामगार काम करीत असताना त्याला सुरक्षेसाठी डोक्याला हेल्मेट, हॅन्डग्लोज, गमबूट, डोळ्यांना घालण्यासाठी गॉगल, इमारतींवर चढण्यासाठी पाळणा, शिडी, लिफ्ट यांसारख्या सुरक्षेची साधनसामुग्री कंपनीतील प्रशासनाने देणे बंधनकारक आहे. याचा कामगारांनी वापर करणे हे ही बंधनकारक आहे. तसेच प्राथमिक उपचारासाठी कंपनीत डॉक्टर ठेवणे हा ही नियम आहे. पण, बऱ्याच कंपनीत कामगारांना सुरक्षेसाठी काहिच दिले जात नाही. फक्त काही हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या मोठ्या कंपनीतील कामगारांना सुरक्षा किट दिले जाते. अनेक ठिकाणी कामगारांना सुरक्षा किट दिले जाते; पण कामगार ते ही घालण्यास टाळाटाळ करतात.

कंपनी प्रशासनाने कामगारांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा किट दिले पाहिजे. ज्या वेळी एखादा अपघात होईल तेव्हा त्या कामगाराला कोणतीही ईजा होणार नाही याची जबाबदारी कंपनी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. हा शासनाचा नियम आहे; पण हा नियम पूर्णत: पायदळी तुडवला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठा फौड्री उद्योग आणि काजू उद्योग हा कामगारांवर अवलंबून आहे. याच कामगारांनी हा उद्योग जगभरात सातासमुद्रापार पोहोचविला आहे; पण हा उद्योग एवढ्या उंचीवर पोहोचविण्यात कामगारांचा मोठा वाटा आहेच. आज मात्र याच कामगारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. 

चार दिवसांपूर्वी शिरोली एमआयडीसीमध्ये झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटाची पुर्ण चौकशी केली जाणार आहे. तसेच औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी कामगारांच्या सुरक्षेच्यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. कामगारांना सर्व सुरक्षा पुरविली पाहिजे. जे उद्योग कामगारांना सुरक्षा पुरविण्यास कमतरता दाखवत असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- सी. व्ही. लभाणे, सहसंचालक,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग.एमआयडीसीत काम करणारा कामगार आज सुरक्षित नाही. वारंवार अपघात होत आहेत. यात कामगारांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. काही ठराविक कंपन्यांमध्येच कामगारांच्या आरोग्याची सुरक्षेबाबत काळजी घेतली जाते. याबाबत सर्व कामगार युनियन लवकरच लेबर कमिशनर व जिल्हाधिकारी यांना भेटणार आहोत .-क्रॉम्रेड इम्रान इलाई जंगले,कोल्हापूर जनरल कामगार युनियन, लालबावटा जनरल सेक्रेटरी.मालक लोकांनी कामगारांना सुरक्षा ही दिलीच पाहिजे. कंपनीत काम करणारा कामगार हाच कंपनीचा कणा आहे. कामगार सुरक्षित तर कंपनी सुरक्षित त्यामुळे प्रत्येक मालकांने कामगारांना सुरक्षा दिली पाहिजे. एक वर्षापूर्वी स्मॅकच्यावतीने दवाखाना सुरू केला आहे. त्याचाही उद्योजक आणि कामगारांनी लाभ घ्यावा.- राजू पाटील, स्मॅक अध्यक्ष

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMIDCएमआयडीसी