शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

शिवाजी पुलाच्या कामास ठेकेदाराचा नकार-बँक गॅरंटी मागितली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 01:11 IST

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम ‘लाल फितीत’ अडकले असून, या उर्वरित कामाची वेळेत वर्कआॅर्डर न दिल्याने आता नव्या ठेकेदारानेही काम पूर्ण करण्यासाठी पाठ फिरवली आहे

ठळक मुद्देवेळेत वर्कआॅर्डर न दिल्याने काम करण्यास असमर्थता

तानाजी पोवार ।कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम ‘लाल फितीत’ अडकले असून, या उर्वरित कामाची वेळेत वर्कआॅर्डर न दिल्याने आता नव्या ठेकेदारानेही काम पूर्ण करण्यासाठी पाठ फिरवली आहे. पुलाचे उर्वरित सुमारे २ कोटी ७५ लाखांचे काम पूर्ण करण्यासाठी जबाबदारी घेतलेल्या गोव्यातील आसमास कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीने बँक गॅरंटीची १५ लाखांची रक्कम परत देण्याची लेखी मागणी करून काम करण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे शिवाजी पुलाच्या बांधकामाचा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे.ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाचे आयुर्मान संपल्याने पर्यायी पुलाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले. आतापर्यंत या पर्यायी पुलाच्या बांधकामावर सुमारे १० कोटी रुपये खर्च केला आहे. पण त्यानंतरचे काम पुरातत्त्व विभागाच्या ‘लाल फितीत’ अडकल्याने हे काम जून २०१५ पासून बंद आहे. त्यासाठी आणखी पावणेतीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. काम अर्धवट अवस्थेत रेंगाळल्याने जुन्या ठेकेदाराने कामच सोडले.उर्वरित कामासाठी खासदार धनंजय महाडिक आणि खासदार संभाजीराजे यांनी वारंवार पाठपुरावा केला. पुरातत्त्व विभागाकडून आलेल्या अडथळ्यांवर लोकसभेतून मार्ग निघाला, पण राज्यसभेचे कामकाज न चालल्याने अंतिम मंजुरी मिळाली नाही.दरम्यानच्या कालावधीत पुरातत्त्वची मंजुरी मिळेल, या अपेक्षेने हे पुलाचे उर्वरित २ कोटी ७५ लाखांचे काम पाच महिन्यांपूर्वी गोव्याच्या आसमास कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस दिले. त्यासाठी या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुमारे १५ लाख रुपयांची बँक गॅरंटी जमा केली, पण पुलाला मंजुरी मिळालीच नाही. गेले चार-पाच महिने कामाची वर्कआॅर्डर न दिल्याने बँकेचे वाढणारे व्याज न परवडणारे झाल्याने आसमास कन्स्ट्रक्शन कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रकल्प विभागास पत्र पाठवून जमा केलेली बँक गॅरंटीची रक्कम परत द्यावी, अशी मागणी करून हे उर्वरित काम पूर्ण करण्यास असमर्थता दर्शविली.‘आपत्कालीन’मधूनही नकारपर्यायी शिवाजी पुलाबाबतचा पुरातत्त्व विभागाच्या मंजुरीचा प्रश्न राज्यसभेत अडकल्याने आता हे उर्वरित काम ‘आपत्कालीन’मधून पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केला. तशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आल्या, पण हे ‘आपत्कालिन’ योजनेतील काम आपल्या अखत्यारीत येत नसल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रकल्प विभागास कळविल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग