शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी तालुक्यात सुतार शाळेत कामांची घाई

By admin | Updated: June 24, 2017 00:09 IST

बळिराजाची अवजारांसाठी धावपळ : पैशांचा प्रत्यक्ष व्यवहार न चालता धान्य स्वरूपात वस्तूंची देवाणघेवाण

रमेश साबळे ।  -लोकमत न्यूज नेटवर्ककसबा तारळे : राधानगरी तालुक्यात खरीप हंगामातील रोप लावणीसह शेतीच्या मशागतीसाठी लागणारी अवजारे तयार करण्यासाठी बारा बलुतेदार असणाऱ्या सुतार शाळेत कामांची घाई उडाली आहे. या भागात अजूनही ही सर्व अवजारे ‘धान्य स्वरूपातच करून घेतली जातात.राधानगरी तालुक्यातील शेतीचा बहुतांश भाग डोंगराळ आहे. त्यामुळे शेतीसाठी या भागात तांत्रिक अवजारांचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे अजूनही पारंपरिक लाकडी अवजारांचाच वापर शेतकरी करतात. त्यामुळे खरिपांसाठी नांगरी, घुट्टा, जू, दिंड, कुरपण, नुमने, मुठव्या, आदी अवजारांसह विळा, कोयता, कुदळ, टिकाव यांना दांडा बसविण्याची घाई सुतार शाळेत उडाली आहे. सुतारांनी लागेल ती अवजारे तयार करून वर्षभरामध्ये द्यायची आणी बळिराजाने आपल्या रानातून पिकविलेले धान्यरूपात ‘बैतं’ सुताराला द्यावयाचे या ठिकाणी पैशांचा प्रत्यक्ष व्यवहार न चालता धान्य स्वरूपात वस्तूंची आजही देवाणघेवाण चालत आहे. त्यामुळेच येथील जनता एकमेकांवर अवलंबून असते.म्हणून आजही या आधुनिक काळात बळिराजा आणी सुतार यांच्यामध्ये ‘बैतं’ ही पद्धत टिकून आहे. काहीअंशी तांत्रिक मशिनरीने या व्यवसायावर मर्यादा आणलेल्या असल्याने जीवन जगणे मुश्कील होऊन बसले आहे.