शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
3
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
4
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
5
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
6
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
7
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
9
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
10
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
11
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
12
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
13
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
14
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
15
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
16
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
17
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
18
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
19
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
20
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक

सांगली-कोल्हापूर मार्गाच्या कामाची लगीनघाई जोमात

By admin | Updated: July 16, 2015 20:52 IST

पावसाने ओढ दिल्याने कामाला गती : महामार्गावर वाहतूक कोंडी मात्र कायमच

संतोष बामणे - जयसिंगपूर -पावसाने ओढ दिल्याने सांगली-कोल्हापूर महामार्गाचे काम आता वेगाच्या सुसाट्यात चालू असून आता महामार्ग लवकरच होणार अशी चिन्हे दिसत आहेत. मात्र, पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली तर हे काम रखडणार आहे. दरम्यान, तमदलगे-उदगाव बायपास रस्ता व अंकली-सांगली रस्त्याच्या कामाची लगीनघाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे.गेल्या दोन वर्षांपासून सांगली-कोल्हापूर महामार्गावरील रस्त्याच्या कामाची वाऱ्यावरची वरात अशी गत झाली होती. मात्र, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन ३१ मे ची मुदत सुप्रीम कंपनीला दिली होती, पण त्यादरम्यान या रस्त्याचे काम होऊ शकले नाही. पाऊस नसल्याने आता मोठ्या जोमात काम सुरू असल्याचे चित्र महामार्गावर दिसत आहे.उदगाव येथील बायपास रस्त्यावर गेल्या दीड वर्षापासून छोट्या पुुुुुलाचे काम चालू होते. ते आता पूर्णत्वास आले असून या मार्गावर चार मोठी वळणे होती. ही वळणे दूर करण्यासाठी नवीन जमीन संपादित करून सरळ मार्ग करण्यासाठी काम चालू आहे. येथील मार्गावर बाह्यवळण नसल्यामुळे महामार्ग सुसाट होणार आहे. तसेच तमदलगे, जयसिंगपूर, उदगाव पुलापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. मात्र, हा रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र, वाहतूक कोंडीही नित्याचीच बनली आहे.अंकली-सांगली या पाच किलोमीटरच्या अंतरावर आता रस्त्याचे काम सुरू झाले असून येत्या महिन्याभारात हे काम पूर्ण होईल, असेच चित्र आहे. महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे वाहनधारक हतबल झाले असून काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दिशाफलक, काम चालूचे फलक लावण्यात आलेले नाहीत. गेल्या काही दिवसांपूर्वी केलेले डांबरीकरण हे वाहनांच्या वाहतुकीसाठी गैरसोयीचे बनत आहे. गावामध्ये साईडपट्टीत मुरुम न टाकल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.गेल्या चार वर्षांपासून सांगली-कोल्हापूर महामार्गावरील शिरोली, हालोंडी, हेरले, चोकाक, अतिग्रे, हातक णंगले, मजले, तमदलगे, निमशिरगांव, जैनापूर, जयसिंगपूर, उदगाव, अंकली ते सांगलीपर्यंतच्या गावातील नागरिकांना रस्त्याच्या कामात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी काही गावांना शासनाशी भांडावे लागले होते. विविध अपघातात वाहनधारकांनी आपला जीवही गमावला आहे, पण महामार्ग पूर्ण झाल्यास या गावांना मोठी रोजगार प्राप्त होणार आहे व महामार्गालगत असलेल्या जमिनींना आज सोन्याचा भाव मिळाला आहे, हे मात्र नक्की.