शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरचे राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम रखडले

By admin | Updated: October 7, 2015 23:56 IST

ग्रामस्थांचे शुद्ध पाण्याविना हाल : निकृष्ट व अपूर्ण काम असल्याने ग्रामपंचायतीचा ताब्यात घेण्यास नकार

गणपती कोळी -- कुरूंदवाड--राजापूर (ता. शिरोळ) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम गेल्या तीन वर्षांपासून अंतिम टप्प्यात रखडले आहे. योजनेचे काम निकृष्ट व अपूर्ण असल्याने ग्रामपंचायतीने योजना ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नदी उशाला असूनही ग्रामस्थांचे शुद्ध पाण्याविना हाल होत आहेत. या योजनेची चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीने पत्राद्वारे केली आहे.कृष्णा नदीकाठावर छोट्या लोकवस्तीचे शिरोळ तालुक्यातील हे गाव आहे. ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध व मुबलक पाणी मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीने राष्ट्रीय पेयजल योजना राबविली. सुमारे ८२ लाख रुपये खर्चाची योजना २०११-१२ साली मंजूर होऊन ठेकेदाराकडून कामही चालू झाले. मात्र, तीन वर्षे झाली तरी अद्याप योजना पूर्णत्वास नाही.नदीपासून मुख्य जलवाहिनी, अंतर्गत पाईपलाईन, पाण्याची टाकी, फिल्टर असे ९० टक्केकाम पूर्ण झाले आहे. मात्र, अंतर्गत पाईपलाईन अवघ्या एक फूट खोलीवर जमिनीत घातल्याने वाहतुकीच्या वर्दळीने योजना चालू होण्यापूर्वी पाईपलाईन चेपली आहे. पाण्याची मुख्य टाकी, साठवणीच्या टाकीला गळती लागली आहे. ठेकेदाराच्या कामाच्या निकृष्टतेबद्दल वारंवार तक्रार करूनही ठेकेदाराने दखल घेतली नाही. त्यातच २०१४ मध्ये ग्रामपंचायतीची सत्ता बदलल्याने योजनेच्या निकृष्ट कामामुळे ग्रामपंचायतीच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी योजना ताब्यात घेतली नाही.परिणामी, ग्रामपंचायतीच्या जुन्या नळ पाणीपुरवठ्याद्वारे अपुरा व अशुद्ध पाणीपुरवठा होत असून, शासनाचे लाखो रुपये खर्ची घालून ठेकेदाराच्या चुकीमुळे ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ठेकेदारावर कारवाईचा ठराव करण्यात आला आहे. तर ग्रामपंचायतीनेही निकृष्ट कामाची चौकशी होऊन ठेकेदारावर योग्य ती कारवाई होण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे केली आहे. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात येथील योजना सापडली असून, नदी उशाला असूनही ग्रामस्थांचे शुद्ध पाण्याविना हाल होत आहेत. या योाजनेच्या निकृष्ट कामाबद्दल ठेकेदाराबरोबरच शिरोळ पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे शिरोळच्या गटविकास अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली आहे, व कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. ग्रामसभा व ग्रामपंचायत सभेमध्ये ठेकेदाराला उपस्थित राहण्यास सांगूनही उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांचे शुद्ध पाण्याविना होणारे हाल याला ठेकेदारच जबाबदार असून, जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे. प्रसंगी न्यायालयातही जाण्याची आमची तयारी आहे. - सतीश आवटी, राजापूर उपसरपंच.