शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सहापदरीकरणाच्या सुधारित आराखड्याचे काम सुरू, पूरनियंत्रणसंबंधी नियमावलींचा विचार करा

By संदीप आडनाईक | Updated: December 17, 2023 18:30 IST

असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्सची नव्याने मागणी

कोल्हापूर: पंचगंगा नदीवरील कागल-सातारा पॅकेज-१ अंतर्गत शिरोलीतील नवीन पुलाच्या दोन्ही बाजूंना भराव टाकून काम करण्याला असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्सने विरोध केल्यामुळे नव्याने सुरू असलेला सुधारित आराखडा केंद्र, तसेच राज्य सरकारची पूरनियंत्रणासंदर्भातील नियमावलींनुसार आणि वडनेरे समितीच्या अहवालातील शिफारशींनुसारच करावा, अशी नवी मागणी असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्सने शनिवारी ई-मेलद्वारे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. या सूचना न पाळल्यास कोल्हापूर आणि परिसराला महापुराचा धोका कायमस्वरूपी राहील, असा इशाराही दिला आहे.

शिरोली येथील नवीन पूल सध्याच्या पुलापेक्षा १० ते ११ फूट उंच अणि बास्केट ब्रिज त्यापेक्षाही जास्त म्हणजे अंदाजे १८ फूट उंचावर बांधण्यासाठी त्या प्रमाणात दोन्ही बाजूंना भरावाचे नियोजन आहे. याला असोसिएशनने विरोध केला आहे. जागतिक तापमानवाढ व हवामानातील बदल यामुळे बदललेल्या पर्जन्यवृष्टीचे स्वरूप पाहता केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, या नियमावलीला डावलून कोल्हापुरातील काम करण्यात येत असल्याची भीतीही असोसिएशनने या पत्रात व्यक्त केली आहे.

राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाचे पूरनियंत्रणसंबंधी २०१८ मधील परिपत्रक, तसेच २०१५ मधील जल संसाधने विभागाचे परिपत्रक, इंडियन रोड काँग्रेस कोडमधील मार्गदर्शक तत्त्वे, निषिद्ध क्षेत्र (ब्लू लाइन) आणि नियंत्रण क्षेत्रातील (रेड लाइन) मार्गदर्शक तत्त्वे, तसेच वडनेरे समितीच्या अहवालातील शिफारशींनुसार असंख्य नियमावली आहे. त्याला डावलले जात आहे, असा आरोप असोसिएशनने केला आहे.यासंदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, विरोधी पक्षनेते, पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी, तसेच प्राधिकरणासंबंधित अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे; परंतु ठोस कार्यवाही झालेली नाही. याशिवाय महापुरात महामार्गावरील नदीवरील पूल बांधताना वाहतूक सुरू राहावी, आपत्ती निवारणासाठीच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, अशाही सूचना असोसिएशनने केल्या आहेत.

भविष्यात निश्चित कालावधी ठरवून जिल्ह्यातील पूरप्रवण क्षेत्रातील पुलांबाबतीत ठोस धोरण ठरवून महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी आराखडा बनवावा, तांत्रिक संस्था म्हणून असोसिएशनचा सहभाग यापुढेही राहील.-अजय कोराणे, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूर