शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम सुरू होणार डी. के. शर्मा यांची माहिती : शाहू टर्मिनसची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:50 IST

कोल्हापूर : कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाबाबत लवकरच चांगली बातमी मिळेल, असे सांगत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी या मार्गाचे काम लवकरच सुरू होईल, असे संकेत दिले

कोल्हापूर : कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाबाबत लवकरच चांगली बातमी मिळेल, असे सांगत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी या मार्गाचे काम लवकरच सुरू होईल, असे संकेत दिले. बुधवारी सकाळी त्यांनी येथील राजर्षी शाहू टर्मिनसची पाहणी केली; त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

येत्या पाच वर्षांत देशभरातील ब्रॉडगेजच्या सर्व मार्गांचे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुणे-मिरज या मार्गाच्या विद्युतीकरणाचे कामही सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल. त्यामुळे गाड्यांची संख्या आणि वेग वाढणार असल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूर रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे शर्मा आणि त्यांच्यासोबत आलेल्या वरिष्ठ अधिकाºयांचे कोल्हापुरी फेटे बांधून तसेच औक्षण करून स्वागत केले.

सकाळी नऊपासून शर्मा यांनी संपूर्ण स्थानकाची पाहणी केली. यावेळी चालू असलेल्या कामाची माहिती घेत, ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या. यावेळी अरुंधती महाडिक यांच्या हस्ते व्ही. आय. पी. कक्षाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत पुणे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, पुणे मंडल वाणिज्य व्यवस्थापक कृष्णात पाटील यांच्यासह पुणे विभागाच्या सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी अरुंधती महाडिक यांनी ‘ग्रीन व्हिजन’ संस्थेतर्फे रेल्वेस्थानक अधिकाधिक सुंदर करणार असल्याचे सांगितले. शर्मा यांनी येथील चित्रे पाहून चित्रकारांचे कौतुक केले. काही दिवसांपूर्र्वी रेल्वेच्या ए. सी. कोचमध्ये मृत उंदीर सापडला होता. याबाबत एका प्रवाशाने तक्रार केली होती. या प्रकाराची दखल घेत शर्मा यांनी संबंधित अधिकाºयांची कानउघाडणी केली. रेल्वेत प्रवास करणाºया महिलांच्या सुरक्षेबद्दल महाव्यवस्थापक शर्मा यांना महिला प्रवासी संघटनेच्या वंदना सोनवणे यांनी निवेदन दिले. लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकलमध्ये गर्दुले, भिकारी व मद्यप्यांचा वावर मोठा आहे. त्यांच्याकडून महिला प्रवाशांवर हल्ले व त्यांची छेडछाड होते. रेल्वे पोलिसांकडून काही वेळा त्यांच्यावर जुजबी कारवाई केली जाते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.गडमुडश्ािंगी-गांधीनगर भुयारी मार्ग करागडमुडशिंगी आणि गांधीनगर या मार्गावरून दररोज चार ते पाच हजार लोक ये-जा करीत असतात. १० ते १२ गावांतील लोकांच्या सोयीसाठी लोहिया कंपाउंडजवळ भुयार बांधले जावे, अशी मागणी करवीर पंचायत समितीचे सभापती प्रदीप झांबरे यांनी केली. यावेळी दिलीप थोरात, पिंटू सोनुले, मीरासाब कोलप, गुंडा वायदंडे, बच्चू घाडगे, शिवतेज झांबरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.गांधीनगरला गाड्या थांबवागांधीनगरच्या शिष्टमंडळने शर्मा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. गांधीनगर येथे प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे सर्व गाड्या थांबाव्यात. स्थानकावरील स्वच्छतागृहे बंद आहेत. एखादी गाडी उशिरा सुटणार असेल तर त्याची माहिती उपलब्ध होत नाही. निवारा शेड अपुरी असल्याने ती वाढविणे गरजेचे असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. यामध्ये रमेश तनवाणी, नानक उर्फ बंडू सुंदराणी, महिला मंदिर कार्यकर्त्या पोपरी केसवाणी, गुल बद्रेल, चंद्रलाल वासवाणी, आदींचा समावेश होता.कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज टर्मिनसची मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी बुधवारी पाहणी केली. यावेळी अरुंधती महाडिक यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी मिलिंंद देऊस्कर, कृष्णात पाटील, विजय कुमार, शिवनाथ बियाणी, मोहन शेटे, समीर शेठ उपस्थित होते.