शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

काम तमानकवाड्यात, पगार हणबरवाडीत

By admin | Updated: October 21, 2016 00:35 IST

मुलांचे शैक्षणिक नुकसान

म्हाकवे : हणबरवाडी (ता. कागल) येथील प्राथमिक शाळेमध्ये नेमणूक आणि पगारपत्रकासह खर्चही याच शाळेवर पडत असताना, गेल्या १४ महिन्यांपासून डॅनियल फिलीप बारदेस्कर हे शिक्षक तमनाकवाड येथे कार्यरत आहेत. यामुळे हणबरवाडीतील पद रिक्त राहिल्याने गेल्या वर्षभरापासून मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकासह त्याला पाठिशी घालणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ यंत्रणेवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हमिदवाडा (ता. कागल) येथील सामजिक कार्यकर्ते विजय मारुती साटपे यांनी जि.प.चे मुख्याधिकारी कुणाल खेमनार यांच्याकडे केली आहे. तसेच विजय साटपे यांनी माहिती अधिकाराखाली या शिक्षकाच्या पगारपत्रकापासून हजेरीपत्रक, वर्षभरात हणबरवाडी शाळेला कोणकोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या, शेरेबुकामध्ये याबाबत काय नोंदी केल्या, यांचीही सखोल ४१९ पानांची माहिती मिळविली आहे. हणबरवाडी येथे पहिली ते सातवीपर्यंत शाळा असून, येथे चार शिक्षकांची नेमणूक आहे. मात्र, बारदेस्कर हे जून २0१५ पासून या शाळेकडे फिरकलेलेच नाहीत. त्यामुळे सातही वर्गांची जबाबदारी तीन शिक्षकांवरच आहे. तर यापैकी एक मुख्याध्यापक असल्याने त्यांना अन्य शैक्षणिक कामे, केंद्रशाळा, तालुक्याची मिटिंग याबाबतचा विचार केला, तर दोनच शिक्षकांवर सातही वर्गांची जबाबदारी पडते. यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरच याचा थेट परिणाम होणार आहे. याला जबाबदार कोण? असा सवालही पालक वर्गासह साठपे यांनी केला आहे. तसेच कागलसारख्या राजकीयदृष्ट्या जागृत असणाऱ्या तालुक्यातील शाळेत या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष होतेच कसे? हा महत्त्वाचा विषय आहे. साटपे यांनी या प्रकरणाच्या अगदी मुळाशी जाऊन ठोस पुरावेही उपलब्ध करून ते जि.प.च्या सीईआेंकडे सादर केले आहेत. यामध्ये २२ नोव्हेंबर २0११ चा नियुक्ती आदेश, वर्षभरात केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, सभापती, जि.प.चे शिक्षणाधिकारी, गटशिक्षणधिकारी यांनी दिलेल्या शाळा भेटींचा अभिप्राय, तसेच येथील १३ जून २0१५ ते आॅगस्ट २0१६ अखेरचे शिक्षक हजेरीपत्रक, गैरहजेरी काळातील संबंधित शिक्षकाला अदा केलेली पगारपत्रके, आदी लेखी पुराव्यांचाही यामध्ये समावेश आहे. साहेबांनी शाळा तपासणी केलीच कसली ? वरिष्ठांनी अचानकपणे शाळांना भेटी देऊन शाळा तपासणी करावयाची असते. मात्र, सर्वच वरिष्ठांनी हणबरवाडीतील शाळेला भेटी देऊन शेरे बुकात नोंदी करून आपल्या कामाचा सोपस्कार पूर्ण केला. मात्र, तब्बल वर्षभर एखादा शिक्षक नेमणुकीच्या ठिकाणी गैरहजर असूनही या गंभीर बाबींकडे त्यांनी कानाडोळा केलाच कसा? हा प्रश्न आहे.