शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

काँग्रेसच्या सत्तेसाठी कामाला लागा

By admin | Updated: September 12, 2016 00:58 IST

प्रकाश आवाडे : पक्ष मानणाऱ्या प्रत्येकाला उमेदवारी मागण्याची मुभा

इचलकरंजी : कोणत्याही संकटाला तोंड देण्यास काँग्रेस पक्ष समर्थ आहे. कोणी कोणाची शिफारस करण्याची गरज नसून झालं गेलं गंगेला मिळालं असे समजून चुकलेल्यांना माफ करूया. पक्ष मानणाऱ्या प्रत्येकाला उमेदवारी मागण्याची मुभा आहे; परंतु एका घरात एकच उमेदवारी दिली जाईल आणि त्याचबरोबर अर्ज करणाऱ्याचाच विचार केला जाईल. आरक्षण कोणतेही असो त्याची तमा न करता नगरपालिकेवर पुन्हा काँग्रेसचा तिरंगा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले. आगामी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने शनिवारी इच्छुकांना अर्ज वाटपाचा प्रारंभ माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे होते. आवाडे पुढे म्हणाले, मागचा इतिहास उगाळत कोण काय केलं याचा पंचनामा करण्यापेक्षा चुकलेल्यांना व पक्ष कार्याची तयारी असलेल्यांना सोबत घेऊया. काँग्रेस पक्षाने नगरपालिकेच्या माध्यमातून विकासगंगा आणली, पण अलीकडच्या काळात गोरगरिबांच्या हक्कावर गदा आणून राज्य शासनाच्या माध्यमातून पोकळ घोषणाबाजी करीत शुद्ध फसवेगिरी केली जात आहे. जनतेला आता चटके जाणवू लागले असून ती योग्यवेळी उत्तर देईल. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, शहरात पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक घटकाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीत चढ-उतार हे असणारच, पण सत्ता नाही म्हणून शांत बसू नका. माफीची दानत ही केवळ काँग्रेसकडेच आहे. अन्य पक्ष केवळ बैठका आणि पोकळ घोषणा करून बोलबाला करीत आहेत. पक्षासह शहराचे अस्तित्व टिकविण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगितले. यावेळी इंटकचे सरचिटणीस शामराव कुलकर्णी, राहुल खंजिरे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रकाशराव सातपुते, सतीश डाळ्या, विलास गाताडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, धोंडीलाल शिरगावे, मुकुंद पोवार, रमेश कबाडे, राहुल आवाडे, महावीर कुरुंदवाडे, चंद्रकांत इंगवले, शशांक बावचकर, अब्राहम आवळे, रवी रजपुते, दिलीप झोळ, रणजित जाधव, श्रीरंग खवरे, के. के. कांबळे, अंजली बावणे, मीनाक्षी माळी, आशादेवी लायकर, नंदाताई साळुंखे, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजी : कोणत्याही संकटाला तोंड देण्यास काँग्रेस पक्ष समर्थ आहे. कोणी कोणाची शिफारस करण्याची गरज नसून झालं गेलं गंगेला मिळालं असे समजून चुकलेल्यांना माफ करूया. पक्ष मानणाऱ्या प्रत्येकाला उमेदवारी मागण्याची मुभा आहे; परंतु एका घरात एकच उमेदवारी दिली जाईल आणि त्याचबरोबर अर्ज करणाऱ्याचाच विचार केला जाईल. आरक्षण कोणतेही असो त्याची तमा न करता नगरपालिकेवर पुन्हा काँग्रेसचा तिरंगा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले. आगामी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने शनिवारी इच्छुकांना अर्ज वाटपाचा प्रारंभ माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे होते. आवाडे पुढे म्हणाले, मागचा इतिहास उगाळत कोण काय केलं याचा पंचनामा करण्यापेक्षा चुकलेल्यांना व पक्ष कार्याची तयारी असलेल्यांना सोबत घेऊया. काँग्रेस पक्षाने नगरपालिकेच्या माध्यमातून विकासगंगा आणली, पण अलीकडच्या काळात गोरगरिबांच्या हक्कावर गदा आणून राज्य शासनाच्या माध्यमातून पोकळ घोषणाबाजी करीत शुद्ध फसवेगिरी केली जात आहे. जनतेला आता चटके जाणवू लागले असून ती योग्यवेळी उत्तर देईल. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, शहरात पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक घटकाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीत चढ-उतार हे असणारच, पण सत्ता नाही म्हणून शांत बसू नका. माफीची दानत ही केवळ काँग्रेसकडेच आहे. अन्य पक्ष केवळ बैठका आणि पोकळ घोषणा करून बोलबाला करीत आहेत. पक्षासह शहराचे अस्तित्व टिकविण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगितले. यावेळी इंटकचे सरचिटणीस शामराव कुलकर्णी, राहुल खंजिरे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रकाशराव सातपुते, सतीश डाळ्या, विलास गाताडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, धोंडीलाल शिरगावे, मुकुंद पोवार, रमेश कबाडे, राहुल आवाडे, महावीर कुरुंदवाडे, चंद्रकांत इंगवले, शशांक बावचकर, अब्राहम आवळे, रवी रजपुते, दिलीप झोळ, रणजित जाधव, श्रीरंग खवरे, के. के. कांबळे, अंजली बावणे, मीनाक्षी माळी, आशादेवी लायकर, नंदाताई साळुंखे, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.