शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

काँग्रेसच्या सत्तेसाठी कामाला लागा

By admin | Updated: September 12, 2016 00:58 IST

प्रकाश आवाडे : पक्ष मानणाऱ्या प्रत्येकाला उमेदवारी मागण्याची मुभा

इचलकरंजी : कोणत्याही संकटाला तोंड देण्यास काँग्रेस पक्ष समर्थ आहे. कोणी कोणाची शिफारस करण्याची गरज नसून झालं गेलं गंगेला मिळालं असे समजून चुकलेल्यांना माफ करूया. पक्ष मानणाऱ्या प्रत्येकाला उमेदवारी मागण्याची मुभा आहे; परंतु एका घरात एकच उमेदवारी दिली जाईल आणि त्याचबरोबर अर्ज करणाऱ्याचाच विचार केला जाईल. आरक्षण कोणतेही असो त्याची तमा न करता नगरपालिकेवर पुन्हा काँग्रेसचा तिरंगा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले. आगामी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने शनिवारी इच्छुकांना अर्ज वाटपाचा प्रारंभ माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे होते. आवाडे पुढे म्हणाले, मागचा इतिहास उगाळत कोण काय केलं याचा पंचनामा करण्यापेक्षा चुकलेल्यांना व पक्ष कार्याची तयारी असलेल्यांना सोबत घेऊया. काँग्रेस पक्षाने नगरपालिकेच्या माध्यमातून विकासगंगा आणली, पण अलीकडच्या काळात गोरगरिबांच्या हक्कावर गदा आणून राज्य शासनाच्या माध्यमातून पोकळ घोषणाबाजी करीत शुद्ध फसवेगिरी केली जात आहे. जनतेला आता चटके जाणवू लागले असून ती योग्यवेळी उत्तर देईल. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, शहरात पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक घटकाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीत चढ-उतार हे असणारच, पण सत्ता नाही म्हणून शांत बसू नका. माफीची दानत ही केवळ काँग्रेसकडेच आहे. अन्य पक्ष केवळ बैठका आणि पोकळ घोषणा करून बोलबाला करीत आहेत. पक्षासह शहराचे अस्तित्व टिकविण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगितले. यावेळी इंटकचे सरचिटणीस शामराव कुलकर्णी, राहुल खंजिरे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रकाशराव सातपुते, सतीश डाळ्या, विलास गाताडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, धोंडीलाल शिरगावे, मुकुंद पोवार, रमेश कबाडे, राहुल आवाडे, महावीर कुरुंदवाडे, चंद्रकांत इंगवले, शशांक बावचकर, अब्राहम आवळे, रवी रजपुते, दिलीप झोळ, रणजित जाधव, श्रीरंग खवरे, के. के. कांबळे, अंजली बावणे, मीनाक्षी माळी, आशादेवी लायकर, नंदाताई साळुंखे, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजी : कोणत्याही संकटाला तोंड देण्यास काँग्रेस पक्ष समर्थ आहे. कोणी कोणाची शिफारस करण्याची गरज नसून झालं गेलं गंगेला मिळालं असे समजून चुकलेल्यांना माफ करूया. पक्ष मानणाऱ्या प्रत्येकाला उमेदवारी मागण्याची मुभा आहे; परंतु एका घरात एकच उमेदवारी दिली जाईल आणि त्याचबरोबर अर्ज करणाऱ्याचाच विचार केला जाईल. आरक्षण कोणतेही असो त्याची तमा न करता नगरपालिकेवर पुन्हा काँग्रेसचा तिरंगा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले. आगामी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने शनिवारी इच्छुकांना अर्ज वाटपाचा प्रारंभ माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे होते. आवाडे पुढे म्हणाले, मागचा इतिहास उगाळत कोण काय केलं याचा पंचनामा करण्यापेक्षा चुकलेल्यांना व पक्ष कार्याची तयारी असलेल्यांना सोबत घेऊया. काँग्रेस पक्षाने नगरपालिकेच्या माध्यमातून विकासगंगा आणली, पण अलीकडच्या काळात गोरगरिबांच्या हक्कावर गदा आणून राज्य शासनाच्या माध्यमातून पोकळ घोषणाबाजी करीत शुद्ध फसवेगिरी केली जात आहे. जनतेला आता चटके जाणवू लागले असून ती योग्यवेळी उत्तर देईल. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, शहरात पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक घटकाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीत चढ-उतार हे असणारच, पण सत्ता नाही म्हणून शांत बसू नका. माफीची दानत ही केवळ काँग्रेसकडेच आहे. अन्य पक्ष केवळ बैठका आणि पोकळ घोषणा करून बोलबाला करीत आहेत. पक्षासह शहराचे अस्तित्व टिकविण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगितले. यावेळी इंटकचे सरचिटणीस शामराव कुलकर्णी, राहुल खंजिरे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रकाशराव सातपुते, सतीश डाळ्या, विलास गाताडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, धोंडीलाल शिरगावे, मुकुंद पोवार, रमेश कबाडे, राहुल आवाडे, महावीर कुरुंदवाडे, चंद्रकांत इंगवले, शशांक बावचकर, अब्राहम आवळे, रवी रजपुते, दिलीप झोळ, रणजित जाधव, श्रीरंग खवरे, के. के. कांबळे, अंजली बावणे, मीनाक्षी माळी, आशादेवी लायकर, नंदाताई साळुंखे, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.