शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कळंबा सुशोभीकरणाचे काम ठप्प: पाठपुराव्याची गरज , दोन कोटी २५ लाखांचा निधी अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:53 IST

कळंबा : शहराच्या दक्षिणेस ६३.९३ हेक्टर परिसरात पसरलेल्या, ७.३५ दशलक्ष पाणी साठवण क्षमता असणाºया, कोल्हापूरच्या वैभवात भर घालणाºया कळंबा तलावाच्या सुशोभीकरणाचे

अमर पाटील ।कळंबा : शहराच्या दक्षिणेस ६३.९३ हेक्टर परिसरात पसरलेल्या, ७.३५ दशलक्ष पाणी साठवण क्षमता असणाºया, कोल्हापूरच्या वैभवात भर घालणाºया कळंबा तलावाच्या सुशोभीकरणाचे १० कोटी रुपयांचे काम गेले दोन महिने बंद आहे. पहिल्या टप्प्यातील मिळालेल्या ७ कोटी ७५ लाखांच्या मंजूर निधीतून जनावरे धुण्याचा हौद, अडीच कि.मी.चा जॉगिंग ट्रॅक, वृक्षारोपण, बंधारा पिचिंग इतकीच कामे झाली असून, यावर अंदाजे ७ कोटी ५० लाखांचा खर्च करण्यात आला आहे.

सुशोभीकरणाच्या १० कोटींच्या निधीपैकी ७ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर होऊन विविध विकासकामांवर खर्ची पडला. आता उर्वरित दोन कोटी २५ लाखांच्या निधीसाठी निविदाधारक कंपनीस मिळणारा निधी व त्यातून होणारी सुशोभीकरणाची विकासकामे याचा स्वतंत्र प्रस्ताव पालिकेस सादर करावा लागेल. पालिका हा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला सादर करेल. प्राधिकरणची मंजुरी मिळताच हा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मंजुरीसाठी जाईल.

या विभागाची मंजुरी मिळताच उर्वरित २ कोटी २५ लाखांचा निधी महापालिकेकडे वर्ग होईल. त्यानंतर उर्वरित सुशोभीकरणाच्या कामास मुहूर्त लागेल.पहिल्या टप्प्यातील मंजूर निधीतील प्रत्यक्षात निविदेतील कामे व झालेली विकासकामे यात तफावत असून, बंधारा पिचिंग व बंधारा पदपथ सुमार दर्जाचा झाला आहे. पालिका आयुक्तांनी या कामाची झाडाझडती घेतली. पिचिंगचे काम पुन्हा करण्यास सांगितले. त्याच्या एक वर्षानंतर दर्जा बघून बिल अदा करण्याच्या सूचना केल्या. सध्या तलाव भरला असल्याने हे काम करता येत नाही. तर उर्वरित कामासाठी निधी नाही. शिल्लक निधी मिळेनासा झाल्याने गेले दोन महिने काम बंद आहे.दहा कोटींचे सुशोभीकरण अंधाराततलावावर बंधारा पिचिंग, प्रवेशद्वार व जॉगिंग ट्रॅक, वृक्षारोपण ही कामे झाली असली तरी पथदिवे नसल्याने एवढे मोठे सुशोभीकरणाचे काम रात्र होताच एकही दिवा नसल्याने अंधारात गडप होते.उर्वरित कामे होणार का?मनोरा दुरुस्ती, अ‍ॅम्पीथिएटर, व्यवस्थापन कार्यालय, स्वच्छतागृहे, मिनी कुस्ती मैदान, पदपथ, पथदिवे, संरक्षक भिंत कामे प्रलंबित आहेत. ७ कोटी ७५ लाखांच्या निधीतील ही कामे आता उर्वरित २ कोटी २५ लाखांच्या निधीत होणार का, हा प्रश्न आहे.देखभालीविना अवास्तव खर्चमुळात दहा कोटींच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या दर्जावर नियंत्रणासाठी पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याने बंधारा पिचिंग प्रवेशद्वार काम दोनदा करावे लागले, तर पालिका मालकीच्या तलावावर देखभालीसाठी एकही कर्मचारी नियुक्त नाही, हे दुर्दैव.