शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा आहार

By admin | Updated: March 17, 2016 00:42 IST

डॉ. शिल्पा जाधव

‘जागतिक महिला दिन’ नुकताच झाला. यानिमित्त यशस्वी महिलांचे सत्कार, स्त्रियांच्या समस्यांवर चर्चा, समान अधिकारांची मागणी, विविध मेळावे, निरनिराळ्या विषयांवर परिसंवाद, रॅलीज, वगैरे कार्यक्रम साग्रसंगीतपणे पार पडले. सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिया हिरिरीने भाग घेत आहेत. प्रगती करत आहेत. राजकारण, शिक्षण, सरकारी नोकऱ्या, आदी सर्व ठिकाणी स्त्रियांसाठी आरक्षण आहे. बरं! यानंतर स्त्रियांना समान हक्क मिळाले का?समाजाने जरी महिलांना स्वातंत्र्य, समान हक्क देऊ केले तरी ते उपभोगण्याची मानसिकता महिलांमध्ये आहे का, ही विचार करण्याची गोष्ट आहे. घराबाहेर सर्व क्षेत्रे काबीज करणाऱ्या स्त्रिया घरामध्ये स्वत:कडे कितीशा आदराने पाहतात? स्वत:चे आरोग्य, आवडीनिवडी यांना किती महत्त्व देतात? जरी अर्धे आयुष्य स्वयंपाकघरात जात असलं तरी सर्वांना वाढून उरेल तेच खायचं आणि काही वाया जाऊ नये म्हणून संपवायचं, या मानसिकतेतून आजची स्त्री एकविसावं शतक उजाडलं तरी बाहेर येत नाहीय. मी ज्या स्त्रियांना भेटले, आहारतज्ज्ञ म्हणून सल्ला दिला, त्यांच्या बोलण्यात ही असहायता स्पष्ट दिसत असते. घरातील मुलांच्या, नवऱ्याच्या आरोग्यविषयक समस्या उद्भवल्या, तर त्यासाठी काहीही करण्याची महिलांची तयारी असते; मात्र त्यांना स्वत:च्या जेवणाच्या वेळा, सवयी बदलण्यास सांगितल्या, तर त्यासाठी त्या असमर्थता दर्शवितात. सकाळी झोपेतून जागे झाल्यापासून स्त्रियांच्या मनात घरातील कामांचे नियोजन, देवपूजा, स्वयंपाक, डबे, पाहुणे, बाजारहाट अशा कामांची यादी चालू असते. परंतु, त्यामध्ये आपण काय खाल्लं आहे, कधी खाल्लं आहे, हे मात्र त्या विसरून जातात अथवा त्याकडे दुर्लक्ष करतात. कितीतरी स्त्रियांच्या पोटात दुपारी बारा वाजेपर्यंत चहाशिवाय काहीही जात नाही. दुपारच्या जेवणानंतर काहीजणी कामासाठी बाहेर पडतात, तर काहीजणी झोप घेतात. परत संध्याकाळी टी. व्ही.समोर बसून काहीतरी अरबट चरबट खाणे होते. पुन्हा रात्री घरातील सर्व मंडळी येईपर्यंत वाट पाहायची आणि त्यानंतर रात्रीचे जेवण, असा साधारणपणे दिनक्रम असतो. जेव्हा आपण सकाळी उठतो, तेव्हा आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी जागी होते. तिला भूकही लागलेली असते आणि तिला कामही करायचं असतं. त्यामुळे सकाळी उठल्याउठल्या लवकरात लवकर काहीतरी खाल्लं पाहिजे आणि चहा हे त्यावरचं उत्तर नाही. चहामुळे भुकेची भावना विरून जाते. आपण नाष्टा पुढे ढकलतो. सकाळी लवकर नाष्टा केल्यास दिवसभरात अचानक खूप भूक लागणे, पित्त होणे, मूडस् बिघडणे या गोष्टींचा त्रास होत नाही. नाष्ट्यामध्ये बाहेरून आणलेले ब्रेड, बिस्किटे वगैरे पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या एखाद्या धान्याचा पदार्थ, दूध, फळ खाल्लेलं उत्तम! दुपारच्या जेवणामध्ये भात, चपाती अथवा भाकरीसोबत हिरव्या पालेभाज्या, कढी, डाळी, उसळी, ताक किंवा दही, सॅलडस् अशा पदार्थांचा समावेश असू द्यावा. मुले, नवरा घराबाहेर आहेत किंवा तिकडेच जेवतात म्हणून कितीतरी स्त्रिया स्वत:साठी स्वयंपाक करण्याचा व खाण्याचा कंटाळा करतात. जेवणाची एखादी वेळ चुकविल्यास आपली दैनंदिन पोषणमूल्यांची गरज पूर्ण होणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. संध्याकाळी चिप्स, चिवडा या गोष्टींपेक्षा सुका मेवा, फळे, लाह्या, फुटाणे अशा पदार्थांचे सेवन करावे. रात्रीचा आहार शक्यतो हलका असावा. त्यामध्ये तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, लोणची खाणे टाळावे. याउलट प्राणिजन्य प्रथिने (उदा. अंडी, मासे, चिकन) खाण्यासाठी संध्याकाळची वेळ योग्य ठरते. आपला आहार हे आपले इंधन आहे, हे ध्यानात घेऊन प्रत्येकाने आपल्या आहारविहाराची काळजी घेतली तर येणारा प्रत्येक दिवस महिला दिनच असेल; नव्हे महिला युगच असेल, हे निश्चित!!