शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
3
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
4
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
5
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
6
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
7
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
8
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
9
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
10
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
11
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
12
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
13
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
14
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
15
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
16
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
17
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
18
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
19
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
20
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला

कोल्हापूर : ‘महिला बालविकास’मध्ये कंत्राटी भरतीत ‘वाटमारी’, शासनाचे चुकीचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 18:50 IST

महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बालसंरक्षण योजनेत कंत्राटी पद्धतीवर पदे भरण्यात येत असून, नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकडून स्वयंसेवी संस्था व अधिकाऱ्यांच्या पातळीवरही दरमहा पगारातून ठरावीक रक्कम लाच म्हणून घेतली जात असल्याच्या तक्रारी आहेत.

ठळक मुद्दे‘महिला बालविकास’मध्ये कंत्राटी भरतीत ‘वाटमारी’शासनाचे चुकीचे धोरण : निवड समितीमार्फत हवी प्रक्रिया

विश्र्वास पाटील कोल्हापूर : महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बालसंरक्षण योजनेत कंत्राटी पद्धतीवर पदे भरण्यात येत असून, नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकडून स्वयंसेवी संस्था व अधिकाऱ्यांच्या पातळीवरही दरमहा पगारातून ठरावीक रक्कम लाच म्हणून घेतली जात असल्याच्या तक्रारी आहेत.

गेल्या आठवड्यात सांगली जिल्ह्यात याच पदावरील व्यक्तीच्या पदास पुनर्नियुक्ती देण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना सांगली जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आले. त्यामुळे हा विषय राज्यभर चर्चेत आला आहे.एकात्मिक बालसंरक्षण योजना केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येते. ही योजना कायमस्वरूपी कंत्राटी आहे. योजनेत प्रत्येक जिल्ह्यासाठी १२ पदे मंजूर आहेत. त्यांपैकी बालसंरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी व विधि सल्लागार ही पदे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भरण्यात येतात व इतर पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यात येतात.

काही जिल्ह्यांत सर्वच पदे नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांकडून भरली जातात. त्यामुळे या पदांचे मानधन जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय हे त्या अधिकाऱ्यांच्या खात्यावर थेट न जमा करता ज्या संस्थेकडून त्यांची भरती झाली, त्या संस्थेच्या खात्यावर जमा करते. याच टप्प्यावर वाटमारी होते.

या संस्था संबंधित कर्मचाऱ्यांकडून दरमहा किमान २५ टक्क्यांपर्यंत (दोन ते आठ हजार रुपये) त्याच्या पगाराला कात्री लावतात. त्यातून त्या कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक होते. त्यामुळे ही पद्धत बंद करण्याची गरज आहे.अकोला जिल्ह्यात ही सर्वच पदे सेतू कार्यालयामार्फत भरण्यात येतात. ‘सेतू’तर्फे या कर्मचाऱ्यांकडून फक्त ५०० रुपये प्रशासकीय खर्चासाठी कपात करून घेतले जातात. शिवाय दरमहा नियमित मानधन मिळते. जिल्हाधिकारी हेच बालसंरक्षण कक्षाचे अध्यक्ष असतात; त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनेच ही पदे भरल्यास भ्रष्टाचाराला चाप बसू शकतो. शासनाने असा निर्णय घेण्याची मागणी पुढे आली आहे.

कायम नियुक्ती द्यायला नको म्हणून सरकार आउटसोर्सिंग करीत आहे; परंतु ते करताना शासन गैरव्यवहाराला बळ व बेरोजगारांची लूट होईल, असा व्यवहार करीत आहे. या कर्मचाऱ्यांची निवड जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करून त्याचा पगार दरमहा त्याच्या खात्यावर विनाकपात जमा व्हायला हवा.- अतुल देसाईअध्यक्ष, आभास फाउंडेशन, कोल्हापूर

 

एकात्मिक बाल संरक्षण योजनेंतर्गत मानधनजिल्हा बालसंरक्षण अधिकारी- ३३२५०, संरक्षण अधिकारी- २१ हजार, विधि तथा परिवीक्षा अधिकारी- २१ हजार, समुपदेशक, समाजसेवक, लेखापाल व माहिती विश्लेषक प्रत्येकी १४ हजार, मदतनीस तथा टंकलेखक १० हजार व बाह्य कार्यकर्ते ८ हजार. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwomen and child developmentमहिला आणि बालविकास