शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

‘मायक्रो फायनान्स’कडून महिलांनी घेतलेली कर्जे माफ करावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 12:04 IST

‘मायक्रो फायनान्सची सक्ती थांबलीच पाहिजे’, ‘बॅँकांकडून महिलांनी घेतलेली कर्जे माफ करावीत’, ‘मुख्यमंत्री होऊन फायदा काय?, मंगळसूत्र विकते माझी माय, असे फलक मोर्चात झळकत होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर कर्जमाफी मिळावी, निर्वाह भत्ता मिळावा, अनुदान मिळावे, मागतो आम्ही हक्काचे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

ठळक मुद्देसरकारी योजनांमधून विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावे.

कोल्हापूर : मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून तसेच बँकांकडून महिलांनी घेतलेली कर्जे सरसकट माफ करावीत, सरकारी योजना व महिलांसाठी विनातारण कर्जसुविधा उपलब्ध कराव्यात; यासाठी सर्व बँकांना आदेश द्यावेत. यासह विविध मागण्यांसाठी इचलकरंजीच्या छत्रपती शासन महिला आघाडीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली.

दुपारी एकच्या सुमारास दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा आला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. ‘मायक्रो फायनान्सची सक्ती थांबलीच पाहिजे’, ‘बॅँकांकडून महिलांनी घेतलेली कर्जे माफ करावीत’, ‘मुख्यमंत्री होऊन फायदा काय?, मंगळसूत्र विकते माझी माय, असे फलक मोर्चात झळकत होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर कर्जमाफी मिळावी, निर्वाह भत्ता मिळावा, अनुदान मिळावे, मागतो आम्ही हक्काचे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, महापुरानंतर पूरग्रस्त कुटुंबांची अवस्था अतिशय दयनीय आहे. अनेकांचे कुटुंबे उद्ध्वस्त झालीत. त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे अतोनात नुकसान झाले; त्यामुळे शेतमजुरांचे हाल झाले. त्यांचा रोजगार गेला. उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. यातून मार्ग काढत जगण्यासाठी अनेक महिलांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले. या कर्जासाठी मायक्रोफायनान्स कंपन्या व बँका सक्तीचा तगादा लावत आहेत; त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून, पूरग्रस्त भागातील कुटुंबांना कर्जमाफी द्यावी. सरकारी योजनांमधून विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावे. पूरग्रस्त भागाचे फेर पंचनामे करावे व योग्य लाभार्थींना त्वरित मदत द्यावी. अंशत: पडलेल्या घरांना दुरुस्तीसाठी ५0 हजार रुपये व पूर्णपणे पडलेल्या घरांना बांधणीसाठी तीन लाख रुपये त्वरित द्यावे. शेतमजुरी करणाऱ्या महिलांना निर्वाहभत्ता द्यावा. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.आंदोलनात अध्यक्षा दिव्या मगदूम, स्वाती माजगावे, पूनम कांबळे, अलमास तांबोळी, मनीषा कुंभार, सुनीता चौरसिया, बिस्मिल्ला दानवाडे, अमोल कुंभार, सुनील पाटील, संतोष पाटील, अकबर सनदी, आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.===============================================================फोटो : २६११२०१९-कोल-महिला मोर्चाफोटो ओळी : मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून महिलांनी घेतलेली कर्जे माफ करावीत, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी छत्रपती शासन महिला आघाडीतर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून निदर्शने केली.========================================(प्रवीण देसाई)

 

टॅग्स :MONEYपैसाStrikeसंप