शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

थकीत बिले दिल्याशिवाय धुराडी पेटू देणार नाही : ‘रयत’चा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 18:11 IST

थकीत बिले दिल्याशिवाय साखर कारखान्यांची धुराडी पेटू दिली जाणार नाहीत, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देकृषिराज्यमंत्री खोत यांच्या ‘रयत’चा इशाराबुलढाणा येथे ३१ आॅक्टोबरला मेळावासदाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट संघटनेची राज्य कार्यकारिणी निवड

कोल्हापूर, 10 : थकीत बिले दिल्याशिवाय साखर कारखान्यांची धुराडी पेटू दिली जाणार नाहीत, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकºयांची गेल्या वर्षीची बिले अद्याप दिलेली नाहीत. बिले थकीत असल्याने शेतकºयांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी थकीत बिले दिल्याशिवाय या वर्षी साखर कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत, अशी भूमिका रयत क्रांती संघटनेने घेतली आहे.

थकीत बिले देण्यास टाळाटाळ अथवा चालढकल करणारे कारखानदार, त्यांच्या अध्यक्षांना सरकारदरबारी उभे करून संबंधित बिले देण्यास भाग पाडले जाईल. सन २०१७-१८ साठीच्या गळीत हंगामास उसाची पहिली उचल एफआरपी अधिक ३०० रुपये विनाकपात मिळावी. साखरेचा हमीभाव कमीत कमी ४००० रुपये प्रतिक्विंटल असावा. राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे आॅनलाईन करण्यात यावेत. साखरेचा दर उद्योगधंद्यांसाठी वेगळा आणि घरगुती उपयोगाकरिता वेगळा आकारण्यात यावा. मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाची तत्काळ नियुक्ती करावी. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्गीय महामंडळांवर अध्यक्षांची नियुक्ती करावी. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी योग्य ती पूर्तता करून समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागण्यांसाठी ‘रयत’चे संस्थापक, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

या मागण्यांचे त्यांना निवेदन दिले. ‘रयत’च्या पहिल्या महाराष्ट्र दौºयाची सुरुवात आज, बुधवारी विदर्भातून होणार आहे. बुलढाणा, वाशिम, अकोला, उस्मानाबाद, बीड, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचा दौºयात समावेश आहे. चिखली (जि. बुलढाणा) येथे दि. ३१ आॅक्टोबरला राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा होईल. यानंतर दि. १० नोव्हेंबरला ऊस परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेस श्रीकांत घाटगे, राजू सावंत, दीपक भोसले, भरत पाटील, मधुकर पाटील, आदी उपस्थित होते.

संघटनेची राज्य कार्यकारिणीमुंबई येथे संघटनेची गुरुवारी (दि. ५) संस्थापक, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये संघटनेच्या राज्य दौºयाबाबत चर्चा झाली. राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये सुरेश पाटील (प्रदेशाध्यक्ष), सतीश बारूलकर (कार्याध्यक्ष), शार्दूल जाधवर (युवा प्रदेशाध्यक्ष), राहुल मोरे (उपाध्यक्ष), पांडुरंग शिंदे, जितू अडोलकर, भानुदास श्ािंदे (राज्य प्रवक्ता) यांचा समावेश आहे.